Wednesday 20 July 2011

गुण मेलनावरून विवाह करण्याचा प्रकार बकवास आहे - भाग १

ज्योतिष शास्त्रात 'गुण मेलन' करून विवाह करण्याचा प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. नाडी, राशी, योनी व गुण यांपैकी कोणतेही तीन भाग जुळले कि कुंडली जुळते.

नाडी ८, योनी ४, गण ६ राशी ७ असे गुणांचं वाटप केल  जात

नाडी ८ + योनी ४  + गण ६ = १८ गुण
नाडी ८ + योनी ४ + राशी ७ = १९ गुण
गण ६ + नाडी ८ + राशी ७ = २१ गुण

याचाच अर्थ वरील चार मुख्य भागांपैकी कोणतेही तीन भाग जुळले कि कुंडली जुळते. कारण कमीत कमी १८ गुण मिळताच वर्ण, वश्य, तारा, ग्रहमैत्री, यातून २-४ गुण मिळतातच.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नक्षत्र व राशीचा आधार गुण मेलनासाठी घेतला जातो त्या नक्षत्र राशींचे सर्व गुणधर्म जातकाच्या अंगी असतात का? देव गणाचा जातक खरोखरच देवासारखा सत्वगुणी असतो का ? निदान वैवाहिक जोडीदाराशी तरी सत्वगुणी धर्म पाळतो का ?  अनेक देव गणांच्या जातकांचे विवाहबाह्य संबंध दिसून येतात.  अस का ? राक्षसगणी खरोखरच राक्षसी प्रवृतीचा असतो का ?

एकाच नक्षत्र राशीतच नव्हे तर एकाच नवमांशात जन्माला आलेल्या दोन भिन्न व्यक्तीचे गुणधर्म जर वेगवेगळे दिसून येतात तर त्याच आधारे केलेले गुण मेलन हे विवाह जुळविण्यासाठी निश्चितच कुचकामी आहे.

याकरिता वधूवरांच्या दोन्ही कुंडल्यांचा संपूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्यायला हवा. काही कुडमुड्या ज्योतिषांना पंचांगा पलीकडे ज्ञान नसते पण तेही ३२ गुण जुळतात म्हणून छातीला माती लावून सांगतात 'बिनधास्त लग्न करा ! काही अडचण नाही ' .

खर तर वर किंवा वधू  दोघांनी कुंडली जुळवताना विचार करायला हवा. हि कुंडली माझ्याशी जुळते का ? म्हणजे या व्यक्तीचा स्वभाव माझ्याशी जुळेल का ? थोडक्यात वेव्ह लेंग्थ जुळेल का ? मला मानसिक, शारीरिक समाधान देईल का ? नोकरी करील का ? वगैरे वगैरे .

या सर्वांची उत्तरे १० सेकंदात केल्या जाणा-या गुण मेलनातून देता येऊ शकत नाही.

कुंडलीतून जातकाचे वैवाहिक जीवन कसे राहील हे कळते. त्याच अर्थार्जन, त्याचे नसते उद्योग, त्याची प्रवृत्ती वगैरे सगळ्या गोष्टी कळतात.

समजा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत वैवाहिक जीवन उपभोगण्याची क्षमता नसेल तर ?

उदा. समजा एखादा पुरुष नपुंसक असेल त्याला वैषयिक सुख उपभोगण्याची क्षमताच नसेल आणि त्याचा विवाह रंभा, उर्वशी, मेनकेशी जुळवून  दिला तरी त्याला किंवा तिला त्याचा काय उपयोग?

एखाद्या स्त्रीला मुलच होणार नसेल तर पुरुषाच्या पौरुषत्वाचा तिथे काय उपयोग ?   

एकाच लेखात हा विषय संपत नाही म्हणून हा विषय पुढील भागात घेणार आहे. .....



शुभंभवन्तु !

आपला
नानासाहेब पाटील
 

Thursday 7 July 2011

अनेक व्यवसाय करूनही अपेक्षित यश नाही...

काल माझा एक जुना मित्र मला भेटायला आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हंटला माझ नोकरी व्यवसायाच  बघ  जरा. सध्या म्हणाव तस अर्थार्जन नाही. मी त्याची कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका मांडली व पुढील येणारा काल त्याच्यासाठी कसा असेल ते बघितले. वर दिलेली पत्रिका त्याची आहे. टिचकी मारताच मोठी करून बघता येईल. नाव गोपनीय ठेवले आहे. उगाच त्याला अडचण नको.

जातक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत आहे, त्याच्या म्हणण्यानुसार अनेक व्यवसायही केलेत. पण अपेक्षित यश मिळाले नाही. व्यवसायात अपयशच आल व नोकरीतही म्हणाव तसा उत्कर्ष किंवा प्रगती झाली नाही. अनेक उपायही करून बघितलेत पण परिस्थिती जैसी थे !

पत्रिका जरा वेगळी आहे म्हणून ज्योतिष वाचकांना व अभ्यासकांना तीच विवेचन करता याव तसेच वाईटातून चांगले आउटपूट कसे काढता येते ते कळावे म्हणून हि पत्रिका महत्वाची वाटली.

जातकाला सध्या राहूची महादशा आहे व ती २०२१ पर्यंत आहे.  राहू तृतीयात असून शुक्राच्या दृष्टीत आहे. शुक्र नवमात तसेच व्ययेश व सप्तमेश आहे.

नवम भाव नोकरी व्यवसायात अत्यंत त्रासदायक ठरतो. त्याच कारण म्हणजे जातकाची सतत बदल करण्याची वृत्ती. कोणतेही कारण नसताना नोकरी बदलणे, तसेच व्यवसाय बदलणे, या दोन प्रवृत्तींमुळे सातत्य रहात नाही. दुसरे असे कि या लोकांना सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

नवम भावामुळे देवदर्शन, अनेक धार्मिक स्थळांना भेटी देणे असे प्रकार वाढतात,  इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, म्हणजेच प्रसंग आलाच तर कासेची लंगोटी सोडून देतील. समाज कार्यात, धार्मिक कार्यात सतत भाग घेणे.  म्हणजे काम धंदा सोडून लष्कराच्या भाकरी भाजणे. या सर्व बाबींचा नोकरी व्यवसायावर सतत विरोधात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे नोकरी व्यवसायात स्थिरता लाभात नाही.

वरील भावामुळे नोकरीला प्रोब्लेम आलाच तसेच व्यवसायातही अपयश आल. पण त्याने निवडलेले व्यवसाय त्याच्या पत्रिकेला अनुसरून नसल्यामुळे अडचणी आल्या. मी त्याला कुठला व्यवसाय करावयाचा ते सांगितले. तसेच राहूचा तोडगा व दैवी उपायही सांगितला.

त्याला सांगितले कि आता जोही व्यवसाय करशील तो रिटेल स्वरूपाचाच असला पाहिजे. घाऊक व्यापारात वाट लागेल. व्यवसाय स्वतंत्र न करता भागीदारीत करावा. सगळ्यात महत्वाची अट म्हणजे भागीदारी एखाद्या स्री बरोबर करावी.

हि अट ऐकून तो उडालाच ! तो म्हंटला हे कस शक्य आहे ?

मी म्हंटल का नाही ? बायको, बहिण, आई अस आपल्याच घरातील कुठल्याही स्री बरोबर भागीदारी कर. बाहेर नको.

शुक्र सप्तमेश असल्यामुळे स्री बरोबर केलेली भागीदारी उत्तम प्रतीची ठरते. रोखीच्या व्यवहारात चांगलाच फायदा होतो. घाऊक व्यापार टाळावा.

शुक्र व्ययेश असल्यामुळे खर्चिक वृत्ती वाढणार यात शंकाच नाही पण त्याच शुक्रामुळे कर्जफेडहि होणार.      
 
त्याला आणखी एक महत्वाची सूचना केली कि २०५६ पर्यंत व्यवसायात बदल करू नको.

शुभंभवन्तु  !

आपला
नानासाहेब पाटील