Thursday 19 April 2012

शैक्षणिक शाखेची निवड

नमस्कार मित्रानो ! 

परवा माझ्याकडे एक जातक आले. त्यांच्या मुलाच्या शिक्षणा बद्दल त्यांना निश्चित मार्गदर्शन घ्यायचं होत. हल्ली शिक्षण आणि करियर हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. पूर्वी शिक्षण घेतलं कि कुठे तरी चिकटून अथवा  वशिल्याने चिकटवून घेऊन  पोट भरने हाच प्रमुख  विषय होता. अर्थातच नोकरी करिता निवड  हा निकष नसायचा. पण आता आवडीच्या क्षेत्राची निवड हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. त्यामुळेच या विषयावर वाहिलेला थ्री इडीयट्स हा चित्रपट खूपच फेमस झाला व लोकमनावर व्यापून राहिला. 

मित्रानो पण  एक लक्ष्यात घ्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी अगोदर मुलाचा कल किंवा ज्याला करियर करायचं त्याचा कल कुठे आहे ते कळण गरजेच असत. म्हणजे ज्याला विशिष्ट क्षेत्रात करियर करायचं त्याला त्यात तो यशस्वी होईल का अशी शंका ब-याचदा निर्माण होते किंबहुना त्या संशयामुळेच ती व्यक्ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम न करता कुठेतरी मनाविरुद्ध पाट्या टाकायचं काम करत असते . आपल्या अवती भवती अशी बरीच मंडळी पाहायला मिळतात.   

काही लोक करीयरच्या नावाखाली प्रचंड संघर्ष करताना दिसतात. कधीतरी यशस्वी होतात. पण मग जगायचं राहून जात ना ! त्याच काय ? याला म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे. आता नुसती कल्पना करा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहताना  आयुष्याची किती झीज होत असेल. किती लोकांची अशी तयारी असते. अनेक सुखांचा त्याग करावाच लागतो. म्हणून तर संसारी माणसं आजही कितीही प्रबोधन केल तरी असल्या करियर पासून दूरच राहतात. ते रुटीन म्हणून जे शक्य आहे तेच करतात व आपल्या पाल्याच करीयरही अश्याच पद्धतीच निवडतात. मळलेल्या वाटेनेच जातात. नवीन वाट तयार करण्याच्या फंद्यात  पडत नाहीत. अर्थात  करियर म्हणजे नेहमी नवीन वाट असतेच अस नाही तर जेही काम आपण करतो त्यातून आत्मिक समाधान मिळायला हव आत्मिक जाऊ ध्या निदान अस समाधान मिळायला हव कि त्यात झोकून देता आल पाहिजे. म्हणजे मग प्रगती आपोआप होते.

करीयरमधील संघर्षाची इतर अनेक कारणे  असू शकतात. पण प्रमुख कारण म्हणजे ग्रहदशा. उदाहरण  म्हणून  नवम   भाव  घ्या.   कुंडलीतील नवम भावाचा संबंध शिक्षण क्षेत्राशी आहे. इतर क्षेत्रात जर व्यक्ती काम करत असेल व नवम भाव  कार्यरत असेल  तर  माणसाला स्थैर्य प्राप्त होत नाही. पण याच नवम भावाचा  गुणधर्म मात्र शिक्षण क्षेत्रात काम करणार-या लोकांना फार उपयुक्त आहे. अशी व्यक्ती  डॉक्टरेट होऊन प्राचार्य होऊ शकते. संशोधन करू शकते. जोडीला जर बुधाच कारकत्व असेल तर नामांकित लेखक होऊ शकतात. क्लासेस काढून क्लासेसची साखळी चालवू शकतात वगैरे वगैरे.

उजव्या बाजूला प्रणवची पत्रिका दिलेली आहे.ती टिचकी     मारून मोठी करून पाहता येईल.

या जातकाला सध्या शनीची महादशा चालू आहे. ती २०१८ पर्यंत आहे. नंतर बुध महादशा  २०३५ पर्यंत, केतू महादशा २०४२ पर्यंत, शुक्र महादशा २०६२ पर्यंत.

शनी महादशा १२  ८  १०   शनी रवीच्या नक्षत्रात, रवी ३  ४, बुध महादशा ३  १  बुध शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र  ४  ५  १२,  केतू रवीच्या नक्षत्रात रवी ३  ४,  शुक्र महादशा ४  ५  १२, शुक्र रवीच्या नक्षत्रात रवी पुन्हा ३  ४ या भावात

वरील जंत्री वरून शुक्र व चतुर्थ भावाच २०६२ पर्यंत कारकत्व लक्षात घेऊन मी सांगितले  कि या मुलाने ऑटो मोबाइल इंजिनियरिंग मध्ये करियर करणे उत्तम राहील.

यावर तो जातक आश्चर्यचकित झाला. म्हंटला "अहो काय सांगताय काय ? प्रणव सुद्धा ऑटो मोबाइल इंजिनियरच व्हायचं म्हणतोय."

"अरे वा ! छानच झाल कि मग. " मी म्हंटलो. आणखी काय बोलणार.

"चला हे एक बर झाल. म्हणजे काय करायचं हे निश्चित झाल कि  त्या दिशेने तयारी करता येते. नाहीतरी मी वाहन व्यवसायातच आहे. पण मला शो रुम टाकायला जमल नाही निदान याला तरी जमेल"

"का नाही जमणार ? अवश्य त्याचा तृतीय भाव एजन्सी लाईनच दाखवतोय"

"आज पासून कामाला लागायला हरकत नाही. पण एक शंका होती ?"  त्यांनी चिंतेने विचारल.

"काय ? जी शंका असेल ती स्पष्ट विचारा"

"आजच ठीक आहे पण  उद्या याची आवड बदलली  तर ?"

"त्यासाठीच तर तुम्ही इथे आलात  ना ? २०६२ पर्यंत याला हे करियर उत्तम राहील. हे सगळ पाहूनच मी तुम्हाला सांगितलं ना "

"मग काही हरकत नाही. दिशा पक्की ?" पुन्हा त्यांनी एकवार खात्री करून घेण्यासाठी विचारल.

"पक्की  पक्की  !"    मी त्यांना अपेक्षित खात्री दिली.

 मित्रानो लेख आवडला असेल तर शेअर कराच.....!

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब     

Monday 2 April 2012

नवकोट नारायणाच्या (अरब पती) पत्रिकेतील ग्रहयोग

नमस्कार 

मित्रानो  प्रत्येकाला  अस वाटत कि  आपण धनवान असाव. अर्थात अस वाटण्यात काही गैर नाही. पण प्रत्येकाच्या  नशिबात  तसे योग नसतात. मात्र ज्याच्या पत्रिकेत धनवान होण्याचा  योग असतो तो धनवान होतोच. मग तो उच्च शिक्षित आहे कि  साधारण,  दहावी कि फक्त प्राथमिक शिक्षण झालय याचा संबंध नसतो. बाजूला दिलेली पत्रिका बघा. त्यावर टिचकी मारून ती मोठी करून बघता येईल. 

पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानावरून जातकाची धनस्थिती कशी असेल ते कळते. पत्रिकेत या स्थानी जो ग्रह असेल त्याला धनेश म्हणतात. हे स्थान बिघडलेलं नसाव. मुख्य म्हणजे धनाचा कारक ग्रह हा गुरु आहे. गुरु सु-स्थितीत असला पाहिजे. किमान धन स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी तरी असावी.  

आता या पत्रिकेत धन स्थानी मकर राशी आहे. त्याचा स्वामी शनी तोही त्याच स्थानात आहे.  धनेश धनात म्हणजे उत्तम. असा जातक खावून पिवून सुखी असतो.   ब-यापैकी बँक  बँलन्स  असतो. थोडक्यात हौस मौज करू शकतो. 

धनाचा कारक गुरु दशमात. मित्र ग्रह बुधाच्या कन्या राशीत. गुरूची पाचवी दृष्टी धन स्थानावर. दशमातील गुरु हा मोठ मोठ्या उलाढाली करायला लावतो. दशम स्थान हे कर्माच स्थान आहे. 

धन स्थानात शनी असल्यामुळे माणसाला  आयता  पैसा मिळत नाही. स्वत प्रचंड कष्ट करून  तो मिळवायला लागतात. शनी सहज सहजी यश मिळू देत नाही तसेच एकदम घबाड मिळवून देत नाही तसेच  शनी पाप ग्रह असला तरी तो वाईट कर्म करायाला  भाग पाडत नाही. शनी प्रत्येक काम तावून सुलाखून घेत असतो. या जागी जर राहू असला तर व्यक्ती वाम मार्गाने पैसा कमावणार हे नक्की. 
या व्यक्तीने जीवनात प्रचंड कष्ट केलेत. पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते भारतातील नामवंत उद्योगपती होण्यापर्यंत मजल मारली व प्रचंड पैसा कमावला इतका कि ते अरबपती म्हणून नावाजले गेलेत.  

मित्रानो हि धीरूभाई अंबानी यांची पत्रिका आहे. श्रमाचे मोल हे अनमोल असते. पण त्याला नशिबाची जोड असली कि अशी धीरूभाई सारखी मैलाचे दगड ठरणारी मानस  घडतात. 

शुभं भवतु ! 

आपला 
नानासाहेब