Friday 22 June 2012

बदली होईल का ?

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

बोरीवलीहून दीप्तीचा फोन आला "सर मी तुमच्या खात्यावर फी जमा केली आहे. माझ्या बहिणीच्या काही अडचणी आहेत त्या बघा". दीप्ती म्हणजे आधी फी ट्रान्स्फर करणार मग  इ-पत्राने जे काही कोणाचे प्रश्न असतील ते. 

दीप्तीच  इ पत्र  एप्रिल महिन्याच्या २८ तारखेला  मिळाल.  बहिण वैशालीच्या  संदर्भात. ती सरकारी नोकरीत नुकतीच रुजू झाली. पण पोस्टिंग मात्र कुठे मिळाव तर औरंगाबाद. आता ?  झाली का पंचायीत ? संसाराच  बस्थान सगळ मुंबईत.  अन अश्यात नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर. हरे राम s s ...  सगळच  विस्कळीत. नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर, तेही सरकारी म्हंटल्यावर तात्काळ बदली होण अवघडच. जे ह्या अनुभवातून गेलेत तेच या त्रासाच मुल्यांकन करू शकतात.    नको त्याच तोंड पाह्यला लागत. फालतूतल्या फालतू माणसालाही विनंत्या कराव्या लागतात. संताप, चीड आणि तीही व्यक्त  करता   येत नाही हि आपली मजबुरी एव्हढच काय ते आपल्या हातात.... अर्थात हि सगळी झाली बाहेर बाहेरची कारणं.    खरा प्रकार मात्र वेगळाच असतो. ... आवो देखते है  ग्रहों  का खेल..... 


प्रश्न : सर !.. गेल्या एक महीन्या पासून बदली साठी प्रयत्न चालु आहेत. पण अजुन यश येत नाही. कधी पर्यंत होइल ते सांगा. ?

बाजुलाच तिची पत्रिका दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.

सध्या जाताकास गुरूची महादशा सुरु असून ती २०२३ पर्यंत कार्यरत आहे. गुरु  १२  ५  ८  तसेच गुरु केतूच्या नक्षत्रात केतू ६, केतू  मंगळाच्या दृष्टीत, मंगळ १२ ४  ९ , मंगळ केतुच्याच नक्षत्रात. 

अंतर्दशा शनीची सुरु असून हि दशा १३.०६.२०१२ पर्यंत कार्यरत आहे.  शनी १  ६  ७ शनी रवीच्या नक्षत्रात, रवी ६  १ 

वरील जंत्रीच सूक्ष्म अभ्यास करता अस  लक्षात  येईल कि नवमेश मंगळामुळे आधीच्या नोकरीत बदल. झाला. अंतर्दशास्वामी शनी रवीच्या माध्यमातून षष्टेश त्यामुळे सरकारी नोकरीची संधी मिळाली. व्ययेश मंगळामुळे पोस्टिंग दूर गावी मिळाली. 

अर्थात हे काहीही असो आपल्याला  महत्वाच काय ? बदली होईल काय ? होणार असेल तर कधी ? 

पुन्हा आपली जंत्री बघा.  मंगळ चतुर्थेश म्हणूनही बलवान आहे. चतुर्थ स्थान हे मातृ स्थान आहे. स्व ठिकाण. म्हणजेच बदली होऊन जातक पुन्हा आपल्या मूळ गावी येणार हे नक्की. पण केंव्हा बदली होणार ? जंत्री बघू या.... शनीची अंतर्दशा कौटुंबिक सौख्य कमी करणारी आहे. शनी अजिबात बदली साठी किंवा  मूळ गावी येण्यासाठी पोषक नाही. 

मग मी पुढची अंतर्दशा बघितली. १३ जून नंतर बुधाची अंतर्दशा लागणार. बुध ६  ११  २ असून बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु १२ ५ ८ . बुधाची दशा लाभात असून कौटुंबिक सौख्य वाढवणारी आहे.  त्यामुळे बुधापेक्षा गुरु बलवान असूनही बदली होणार व तीही १३ जून नंतर पहिल्या आठ दिवसात. 

फोन वर मी कुंडलीच विश्लेषण समजावून सांगत असताना दीप्तीला सांगितलं कि १३ जून नंतर बदली होणार व तेही आठ दहा दिवसात. अर्थात अस ऐकल्यानंतर लगेचच विश्वास नसेल बसला म्हणा दीप्तीचा... पण त्यावेळी मात्र मला धन्यवाद सर अस काहीस म्हणाली. अन नेहमी प्रमाणे कामाच्या रगाड्यात मी हि घटना विसरून गेलो. 

अचानक सतरा कि  अठरा तारखेला नक्की आठवत नाही पण सायंकाळी दीप्तीचा फोन आला. "सर बहिणीची बदली झाली. १७ तारखेला तीने मुंबईत ड्युटी जॉईन केली". त्यावेळी मी एका कंसलटन्सित व्यस्त होतो  म्हणून  सविस्तर बोलता आल नाही. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब 

Tuesday 5 June 2012

घटस्फोट होणारच होता ! कारण ...?

!! श्री !!

नमस्कार मित्रानो !

दैवयोग, नियति काय प्रकार आहे याचा काहीना गंधही नसेल. ज्याचं सगळ आलबेल आहे, सिचुएशन अंडर कंट्रोल्ड आहे  अश्या सो कॉल्ड  लोकांना दैव, नियती वगैरे प्रकार  म्हणजे कर्तुत्व शून्य लोकांनी निर्माण केलेली पळवाट आहे असे वाटते. अर्थात अश्या लोकांनाही कधी न कधी नियतीचा दणका बसतोच. असो. 

काल सायंकाळी एक मध्यम वयीन जोडपं माझ्या कार्यालयात आले. मुलीची पत्रिका त्यांना जाणून घ्यायची होती. गेल्या वर्षा पूर्वी   मुलीच लग्न अत्यंत थाटामाटात करून दिल होत. लग्नात मानपान, जेवणावळ, पाहुण्यांची सरबराई वगैरे वगैरे गोष्टी सर्व निट  पार पाडल्या होत्या. तसच मुलीने सुखाने संसार करावा म्हणून समस्त नात्यागोत्याने भरभरून आशीर्वाद दिले होते. 

वर्षभर संसार सुखाचा झाला. अन अचानक दृष्ट लागली................... सासरकडच्या मंडळीने  सांगितले आम्ही मुलीला नांदवनार नाही........इतक्या दिवस गोडी गुलाबीने चाललेला संसार अचानक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला.... काय घडल अस ? 

अर्थात त्यांनी मला जे कारण सांगितलं ते मन सुन्न करणार होत. मुलीला अचानक काही कारण नसताना डायबीटीस डीटेक्ट  झाला. हा आजार मूळीच अनुवांशिक नव्हता. आई वडिलांना त्यामुळे काही सुचेना. कारण या आजाराच गांभीर्य त्यांना माहित नव्हत. पण सासर कडच्या मंडळीने धमकी दिलेली कि मुलीला काही झाल तर आम्ही दवाखाण्यात  घेऊन जाणार नाही. सासरकडच्या मंडळीनी अश्या पद्धतीने हातवर केल्यानंतर इलाजच खुंटला. ...... घटस्फोटा शिवाय पर्याय नव्हता. 

आता पुढे काय ? त्या माता पित्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मूळीच आरोग्य कस राहील तसेच तिच्या  लग्नाचं काय वगैरे ?

पत्रिकेत गुप्ततेमुळे मुलीच नाव काढून टाकले आहे. पत्रिका बाजूला देलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

सध्या जातकास राहूची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. राहूची महादशा  २०२१ पर्यंत कार्यरत आहे. तसेच बुधाची अंतर्दशा १६.०५.२०१४ पर्यंत. राहू अष्टमात, राहू रवीच्या नक्षत्रात, रवी सप्तमात, लग्नेश, राहू मंगळाच्या राशीत, मंगळ  अष्टमात, नवमेश तसेच चतुर्थेश, मंगळ केतूच्या नक्षत्रात , केतू कुटुंब स्थानी, केतू मंगळाच्या दृष्टीत, मंगळ पुन्हा ८, ९, ४ तसेच केतू गुरूच्या नक्षत्रात, गुरु ५, ५  ८, केतू शुक्राच्या राशीत शुक्र ८, १०, ३ व शुक्र बुधाच्या नक्षत्रात,      बुध ७, ११,  २

वरील जंत्रीच्या अभ्यासावरून असे लक्षात येत कि  वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र व सुख स्थानाचा  कारक ग्रह मंगळ  अष्टमात राहुबरोबर. त्यामुळे वैवाहिक सौख्य बिघडलेले आहे. पण या एकमेव कारणास्तव घटस्फोट होणार नाही. कारण अश्या स्थितीत फार फार तर भांडण तंटा, शारीरिक. मानसिक त्रास वगैरे प्रकार होतात. 

तरीही घटस्फोट झाला कारण या जातकाच्या पत्रिकेत पुनर्विवाहाचा योग आहे. भाव चलीत  पत्रिका नीट बघा. सप्तमात बुध आहे. तसेच राहूच्या महादशेत तो कार्येश आहे.  अंतर्दशाही  बुधाचीच आहे.   त्यामुळे पुनर्विवाहाचा योग याच दशेत आला. पुनर्विवाह तेंव्हाच होईल जेंव्हा आधीचे लग्न निकालात निघेल. इतर लोक याच कारण वर वर शोधतील, मुलीच्या सासरकडच्या मंडळीना जबाबदार धरतील. पण .... कारण काहीही असो कर्माचे भोग सुटत नाही. याला म्हणतात संचित. यावरच अवलंबून असत आपल  प्रारब्ध... !


शुभं भवतु ! 

आपला
नानासाहेब