Tuesday 24 July 2012

राहु भयंकर ....


!! श्री !! 

पलीकडून बोलणारा तरुण हुंदके देवून रडत होता. मी त्याच्या कुंडलीच  विश्लेषण समजावून सांगत होतो. म्हणजे मी त्याला खूप काही भयंकर सांगत होतो व म्हणून तो रडत होता अस नाही. तर तो ज्या परिस्थितून जात होता ती परिस्थिती  किती भयंकर आहे हे तो मला सांगत होता व ते सांगताना त्याला रडू आल होत. 

हार्डली चोवीस पंचवीस वय,  उत्साहानं सुरु केलेल्या बिझनेस (तो तरुण गुजरातचा आहे) मध्ये अपयश,   अश्या कोवळ्या वयात २५ ते ३० लाखाच कर्ज डोक्यावर,  घेणेकरांचा  तगादा मागे लागलेला, परतफेड  अशक्य होवून बसलेली,  अश्या असहाय्य परिस्थितीत  कितपत टिकणार तो. 

त्याची पत्रिका बाजूलाच देलेली आहे. त्यावर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

पत्रिकेतून मी नाव गुप्त रहाव म्हणून ते काढून टाकल आहे. या लिखाणाचा उद्देश फक्त इतरांनी जीवनात सुखी आयुष्य जगताना कश्या प्रकारे काळजी घ्यावी हा आहे. काहीना वाटत कि मी  ब्लॉग वर विश्लेषण करूनच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो कि काय ? ब्लॉग वर मी फक्त काही विशेष घटना ज्या मी सांगलीतल्या प्रमाणे घडून आलेल्या असतात शिवाय त्या   अजिबात  खाजगी वगैरे नसतात  अश्याच टाकतो   आणि मी त्यांच्या परवानगीशिवाय त्या लिहित नाही.  असो. 

सध्या त्याला राहूची महादशा  आहे. राहू महादशा २०१० ला  सुरु झाली ती २०२८  पर्यंत कार्यरत राहील. अंतर्दशाही राहुचीच सुरु आहे. राहू स्वत: व्ययात, राहू  शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र लाभात व षष्टेश आहे,  राहू ज्या राशीत  आहे त्याचा राशी स्वामी मंगळ व्ययात, सप्तमेश व   रवीच्या नक्षत्रात, रवी व्ययात व चतुर्थेश. 

वरील जंत्री  वरून काय लक्षात येत बघा.  मंगळ व्ययात , रवी व्ययात , त्यांच्या जोडीला राहू. कर्जबाजारी होणार नाही तर काय होणार ? अश्या दशेत दवाखाना, तुरुंगवास, अनेक चिंता, अप्रिय घटनांची मालिका,  या आणि अशा अनेक गोष्टीच वाट्याला येतात. अक्षरशः घर, गाव सोडून परागंदा व्हाव लागत. अगदी विजनवासात जाव लागत.  कधी कधी अर्ध आयुष्यच कर्जाची परत फेड करण्यात निघून जात. 

अश्या महादशेत व्यवसाय करण्याचा निर्णय घेणच मुळी घातक होत. पण अज्ञान म्हणा कि आणखी काही त्याला वेळेवर मार्गदर्शन उपलब्ध झाले नाही हे मात्र तितकच खर.  

फक्त राहुबद्दल लिहायचं म्हंटल तर स्वतंत्र ग्रंथ निर्मिती होईल. कारण तो छाया ग्रह आहे. ज्योतिष शिरोमणी कृष्णामुर्तिनी आपल्या संशोधनात छाया ग्रहांना जेव्हढ  महत्व दिलय तेवढ अन्य कुणी दिल नसेल कदाचित. 

राहू स्वता:ची फले देतोच पण तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्याचीही फले तीव्र करतो. 

बर हि  महादशा थोडी थोडकी नसते. १८ वर्षा चा  प्रदीर्घ कालावधी असतो हा. ती जर अशी ऐन तारुण्यात आली तर माणसाला देशोधडीला लागण म्हणजे काय याची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. अर्थात प्रत्येक स्थानातला राहू अशीच फले देतो अस नाही. 

मी त्याच सांत्वन केल. त्याला त्यावर राहूचा तोडगा सांगितला व व्यवसायाच्या मागे न लागता छानशी नोकरी करायला सांगितलं. कारण राहू शुक्राच्या  नक्षत्रात  आहे. शुक्र लाभात तसेच षष्टेश आहे. नोकरी करून हळू हळू कर्ज फेड होईल, आणि कसलीही  जी मस्ती न करता हा कालावधी साधनेत घालवावा जेणे करून आयुष्याच मातेरं  होणार नाही.

शुभं भवतु  ! 

 आपला 
नानासाहेब 

Saturday 21 July 2012

कर्माची निवड .......

आयुष्याच्या वाटेवरील अत्यंत महत्वाच वळण म्हणजे आयुष्यभर  आपण काय कर्म करणार ते ठरण किंवा ठरविणे. काहींच हे आपोआप ठरत तर  काहीना ठरावाव लागत. एकदा दिशा निश्चित झाली कि फक्त चालायचं. पण काही लोक असे असतात ज्याचं आयुष्य फक्त काय करायचं हे  ठरविण्यातच  जात. 

कुंडलीतील दशम भाव जातकाच कर्म निश्चित करतो. शनीचा दशम भावाशी कुठल्याना कुठल्या स्वरुपात जर संबंध येत असेल तर साधारणपणे ३५ -४० नंतरच स्थिरत्व येत. तो पर्यंत अनेक नोक-या व्यवसाय बदलतात. शनी परीक्षा घेतो, कसोटीच म्हणाना पण नंतर शनी अगदी भरभरून देतो. पण मधला जो काळ जातो त्या काळात मनुष्य तावून सुलाखून निघतो.  त्यामुळेच  नंतर येणा-या सुवर्णकाळाचा उपभोग त्याला घेता येतो. नाहीतर भरभराट असली कि अनेक लोक उधळ मानके पणा करतात. मी पणा वाढून जातो. बरीच मंडळी सुसह्य जगन असह्य करून घेतात, स्वत:चही करतात व आपल्या आप्तस्वकीयांचही  करतात. 

काल केशवराव आले. त्यांची कुंडली माझ्याकडे संघनकावर  आहेच.  यावेळेस प्रश्न जरा वेगळा होता. त्यांच्या नोकरी व्यवसायाबद्दल चर्चा करण्यासाठी ते आले होते. 

केशवरावचा   प्रश्न होता नोकरी व्यवसायात  स्थिरत्व कधी येणार ? व्यवसाय कुठला करावा ? वगैरे.  

त्यांची पत्रिका बाजूला दिलेली आहे. आपण त्यावर टीचकी मारून ती मोठी करून पाहू शकता. 

सध्या गुरूची महादशा सुरु असून ती २०१४ पर्यंत कार्येश आहे. गुरु ५  ११ चा कार्येश असून तो राहूच्या उप नक्षत्रात आहे. राहू द्वितीयात आहे. राहू मंगळाच्या दृष्टीत, मंगळ ८  ९  १०  २ तसेच तो चंद्राच्या उप नक्षत्रात , चंद्र लाभात तसेच तो षष्ठाचाही  बलवान कार्येश आहे. राहू शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र २  ३  ४  ८.

वरील जंत्रीचा विशेष अभ्यास करावा लागला. कारण पुढील येणारी महादशा शनीची आहे. शनी १  १२ चा कार्येश असून तो रवीच्या नक्षत्रात आहे. रवी १  ७ चा कार्येश. 

पत्रिकेतील गुरु, मंगळ, राहू, केतू हे  चंद्राच्या  माध्यमातून  षष्ठाचेच    मजबूत कार्येश होतात,  त्यामुळे त्याचाच व्यवसाय निवडला. शेती, दुग्ध व्यवसाय, रविमुळे पेस्टी सायीड या व्यवसायांमध्ये त्यांना उत्तम यश राहील. 

अस  सांगितल्यावर त्यांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. 

" शेतीत आजवर आपल्याला नुकसान झालेलं नाही. तसेच शेतात ज्या ज्या भागात मी फिरतो त्या त्या भागातील पिक भरघोस  येत. ज्या भागात मी फिरत नाही तिकडे खास रिझल्ट मिळत नाही." अनुभव सांगताना केशवराव  भूतकाळात  गेले.

"तसेच एकदा मी शेतात बोर मारलं. पाणी कुठे लागेल हे दाखवणारा  पानाड्या हि आणला होता. पण बोर फेल  गेल. नंतर मीच शेतात एक चक्कर मारला व बोर मारणा-याला मी स्वत:च जागा दाखवली. त्या जागेवर असा पाय ठेवला व बोर मारणा-याला  सांगितलं,  मार बोर. त्यान बोर मारताच काय आश्चर्य ? चांगल पाणी लागल . त्यावेळी मला विशेष वाटलं होत. पण आता लक्षात येतंय अस का झाल ते. " केशवराव रंगात  येवून सांगत होते. 

"अहो S  S चंद्र हा जल तत्वाचा कारक असल्यामुळे तुम्हाला हे शक्य झाल." मी  चंद्राच कारकत्व त्यांना समजावून सांगितलं. 

"आता लक्षात येतंय." त्यांनी हसून मान  हलवली. 

"याच व्यवसायात लक्ष घातल   तर धनार्जन उत्तम असेल काळजी करायच कारण नाही,   षष्टातील चंद्रा मुळे तुम्हाला सर्दीचाही त्रास जाणवेल. काही लोकांना हि सर्दी बारमाही सर्दी असते."  मी त्यांना चंद्रामुळे काय विकार होवू शकतो ते सांगितले. 

"आहे,   मला सर्दीचा त्रास अगदी पहिल्या पासून आहे. याचा संबंध कुंडलीतील ग्रहांशी येतो हे मला आजच कळतंय. " त्यांनी दुजोरा  दिला 

"म्हणूनंच तुम्ही आता दुस-या कुठल्याही व्यवसायात लक्ष घालू नका. यातच उत्तम यश मिळेल. उगाच हे करू का ते, एक ना धड भाराभर चिंध्या काय कामाच्या " मी स्पष्ट काय ते सांगितलं. 

"नाही आता स्वानुभवाने लक्षात आलय. डोक्यातला गोंधळ संपला. आता पूर्ण लक्ष मी शेती आणि दुग्ध व्यवसायात घालतो." केशवराव  मोकळेपणाने हसत म्हणाले. 

शुभं भवतु ! 

आपला 
नानासाहेब

Tuesday 3 July 2012

बाळाच्या जन्माचा मुहूर्त....

!! श्री !!
नमस्कार मित्रहो !

रात्री नऊ साडेनवू ची वेळ असेल. कार्यालय बंद  करून घरी निघालो होतो. जेवणाची वेळ झाली होती. पाऊल घराच्या दिशेने भर भर पडत होती. कदाचित सपाटून लागलेल्या भूकेचाही परिणाम असावा तो. शिवाजी चौकात रस्ता ओलांडताना फोन आला. "नमस्कार मी ....... बोलतोय ...ओळखल का ? ..... , मिसेसला दवाखान्यात  डीलेवरी  साठी भरती केलय....डॉक्टर सीझर करायचं म्हणतात,  दोन दिवसाची मुदत दिलीय.   मुहूर्त सांगा..........!"

त्याच फोनवर नाव ऐकताच त्यांची केस क्षणार्धात नजरेसमोर येवून गेली..........


१ नोवेंबर २०११  ला दोन महिला कार्यालयात आल्या होत्या.


"हि माझी मुलगी. हिला आधी एक मुलगा आहे. आता सध्या दिवस गेलेत. डॉक्टरांनी ५ मे २०१२ हि तारीख दिलीय, डीलेवरी नॉर्मल होईल कि सीझर. काही त्रास तर होणार नाही ना ? " त्या मुलीच्या आईने विचारल


" डॉक्टरने काय तारीख दिलेली आहे." मी विचारल
"५  मे  २०१२" मुलीने सांगितले. 

पत्रिका बाजूला दिलेली आहे. त्यावर टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. गुप्ततेमुळे मी कुंडलीतून नाव काढून टाकले आहे. 

सध्या जाताकास शुक्राची महादशा सुरु असून गुरूची  अंतर्दशा २०१४ पर्यंत कार्यरत आहे. शुक्र ९  १  ८ असून तो राहूच्या नक्षत्रात आहे. राहू ४. राहू शनीच्या दृष्टीत, शनी २ ४ ५, शनी केतूच्या नक्षत्रात,  केतू १०.  केतू बुधाच्या युतीत, बुध ११ १२ ९ तसेच बुध शुक्राच्या नक्षत्रत, शुक्र ९ १ ८.  

वरील जंत्रीचा अभ्यास करता असे लक्षात येते कि शुक्र प्रथम स्थानाचा व अष्टम स्थानाचा  मजबूत कार्येश आहे. म्हणजेच शुक्र कुटुंब स्थानाच्या व्ययात आहे. तसेच शुक्र अष्ठ मेशही  आहे त्यामुळे शारीरिक त्रास संभवतो. शुक्र राहूच्या नक्षत्रात व राहू स्वत: चतुर्थात. तसेच शनीच्या दृष्टीत व शनिसुद्धा  चतुर्थेश. राहू व शनी दोन्ही चतुर्थ स्थानाचे म्हणजे संतती सौख्याच्या विरोधात कार्य करणार सहजा सहजी हे सौख्य प्राप्त होणार नाही. तसेच राहू व शनी गर्भपात वगैरे सारख्या घटना घडवून आणू शकतात. 

हे सर्व लक्षात आल्यावर मी त्यांना महिनाभर आधी पासूनच सावध  राहण्यास सांगितले.  विशेष काळजी घेण्यास सांगितले. डॉक्टर ने दिलेल्या तारखेला हि प्रसूती होणार नाही त्याआधीच होईल. म्हणजेच              "प्री म्यचूअर्ड  डिलिवरी". हे ऐकून त्यांना धक्काच बसला. म्हंटल्या "काही वाईट तर नाही ना ? " 

"काळजी घ्यावी  लागेल. वाईट वगैरे काही होणार नाही. कारण शनी पंचमेशही आहे. तसेच ज्या अंतर्दशेत प्रसूती होणार ती गुरूची आहे. गुरु ७  ३  ६ आहे तसेच गुरु चंद्राच्या नक्षत्रात, चंद्र २ १० . चंद्र कुटुंब  स्थानाचा बलवान कार्येश त्यामुळे प्रसूती होवून कौटुंबिक सौख्य वाढणारच यात शंका नाही. 

"काय होईल ?" मुलीच्या आईचा प्रश्न. 

"काही झाल तरी काय फरक पडतो. आता तुम्ही काही करू शकता का ?" 

"नाही हो, फक्त उत्सुकता म्हणून विचारल "

मी येणारी विदशा बघितली तीही गुरूचीच होती. गुरु चंद्राच्या माध्यमातून द्वितीयाचा बलवान कार्येश आहे.  

चंद्र कुटुंब स्थानी मंगळाच्या वृश्चिक  राशीत, मंगळ पंचमात. चंद्र गुरूच्या दृष्टीत. काय होईल. ? 

"पेढे दयायला विसरू नका" मी त्यांना चकित करण्याच्या उद्देशाने म्हंटलो.  

"आम्हाला मुलगी हवी होती. " अस सांगून त्यांनी मला चकित केल. 

"देव करो अन तुमची इच्छा पूर्ण होवो. " मी सांशकपणे आशीर्वादपर बोललो. 

"..............आता मी रस्त्यात आहे. डॉक्टरने दोन दिवसांची मुदत दिलीय ना ?" 

" हो " फोनवरच्या व्यक्तीने सांगितले. 

"उद्या सांगतो. " अस  म्हणून मी फोन वरच  संभाषण थांबवलं. 

दुस-या दिवशी सकाळी त्यांना दुपारचा मुहूर्त सांगितला ती तारीख होती डॉक्टरने दिलेल्या तारखेच्या १७ दिवस आधीची,  १८ एप्रिल २०१२. 

त्याच दिवशी दुपारी दीड दोन च्या दरम्यान त्या मुलीच्या पतीचा फोन आला. "डिलिवरी सुखरूप पार पडली. सिझरच झाल. आणि मुलगा झाला. पेढे घेवून येतो....... 

शुभं भवतु !


आपला 
नानासाहेब