Friday 31 August 2012

दणक्या नंतर प्रसाद ..?

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

रात्री आठ साढे आठ ची वेळ होती. इतक्यात गणेश आला. अर्थात तो मित्रच आहे. तो जसा मित्र आहे तसा जातकही आहे.  जातक ह्या अर्थी कि तो  वेळोवेळी ज्योतिष मार्गदर्शन घेण्याकरिता येत असतो म्हणून. आल्या आल्या त्यान  सांगितलं आपला एक प्रश्न बघायचाय तुझ हातातलं काम संपव मग विचारतो.

त्यान अस म्हंटल्यावर मी माझ हातातल काम संपवलं. "बोल काय प्रश्न आहे ?"

"सोनीची एजन्सी मिळेल का. ? "

"तुझ्याकडे तर सोनी ब्रांड होताच ना ? आता पुन्हा डीलरशिप  म्हणजे  हा काय प्रकार आहे ? " माझा  जरा गोंधळच उडाला. याच इलेक्ट्रोनिक्सच शोरूम आहे. त्यात हा सगळ्या वस्तू नावाजलेल्या कंपनीच्याच ठेवतो म्हणजे सर्विसला ला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही अस तो म्हणतो.

"इथल्याच एका डीलरने  काडया केल्या होत्या. आत्ताच त्याला जाम धुतला. तिकडनच  येतोय. त्या भडव्याला धुतला म्हंटल्यावर कंपनी आपल्याला माल देणार कि नाही ते बघ." त्यान एका दमात सांगितलं  


"ओ के ! काढ टोकन " मी टोकनची  पिशवी पुढे करत म्हंटल.

त्यान टोकन काढल. नंबर होता १७६

मी तो के पी सिड घेवून संघनकावर प्रश्न कुंडली टाकली. ती बाजूलाच दिलेली आहे.


कुंडली संघनकावर छापून आली चंद्र लाभात दिसताच जरा हायस वाटलं.


या कुंडलीचा लाभाचा उप नक्षत्र स्वामी शनी असून शनी दशमात, द्वितीयेश व तृतीयेश आहे. तसेच शनी  मंगळाच्या नक्षत्रात मंगळ दशमात, व्ययेश व पंचमेश आहे. शनी तृतीयाचा कारक आहे. तसेच तो मंगळाच्या माध्यमातून व्ययेश आहे. म्हणजे खर्च होणारच.

मी त्याला म्हंटल "खर्च होईल "

"माल घ्यायचा म्हंटल्यावर खर्च होणारच ना . इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार " त्यान त्याच गणित सांगितलं.

"ठीक आहे" अस म्हणून मी तृतीयाचा उप नक्षत्राकडे लक्ष केंद्रित केल.


तृतीयाचा उप नक्षत्र स्वामी गुरु असून गुरु षष्टात, लग्नेश व चतुर्थेश आहे. गुरु चंद्राच्या नक्षत्रात. चंद्र लाभात व व्ययेश आहे. तृतीयाचा उप नक्षत्र लाभाचा मजबूत कार्येश आहे तसेच लाभाचा उप नक्षत्र तृतीयाचा कार्येश आहे. त्यामुळे  काम होणार हे लक्षात येत.

आता डीलर शिप कधी मिळणार ? किती दिवसात कंपनीचा माल सुरु होणार वगैरे वगैरे ?

सध्या कुंडलीला शनीची महादशा व  केतूची अंतर्दशा  सुरू आहे. केतूची महादशा १८ सप्टेंबर पर्यंत आहे. शनी लाभाचा व तृतीयाचा कार्येश आहेच आता फक्त केतू अंतर्दशेत हे कार्य होणार का ?

केतू पंचमात आहे, केतू - मंगळ व चंद्राच्या दृष्टीत, मंगळ दशमात द्वितीयेश व पंचमेश मंगळ चंद्राच्या              उपनक्षत्रात चंद्र लाभात व व्ययेश, तसेच चंद्र शनीच्या नक्षत्रात त्यामुळे चंद्र लाभाचा व तृतीयाचा मजबूत कार्येश होतो.

एकंदर स्थिती पाहता मी गणेशला म्हंटल. " १८ सप्टेंबर पर्यंत  काम हो जायेगा."

त्यान पुन्हा  खरच का वगैरे विचारल  नाही. कारण त्याला यापूर्वी आलेले अनुभव.

वरील घटना २४ ऑगस्ट ला घडली व ३० ऑगस्टला रिप्लाय आला. त्याची  अन कंपनीची बोलणी यशस्वी   होवून  त्याला पूर्ववत सोनीच्या मालाचा पुरवठा सुरु झाला. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब

Tuesday 28 August 2012

होता गर्भधारणा अशुभ वेळी संतती होई वेडी खुळी !

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

संतती सौख्य हा प्रत्येक  कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संतती होण न  होण पूर्व संचिताचा विषय आहे. संतती नसण  हे तर दुख: आहेच पण असूनही डोंगरा एव्हढे दुख: भोगण्याची   वेळ  आली  तर....

विभिन्न  समाजातील  लोक मतीमंद, वेडी , खुळी  संततीच दु:ख भोगत आहे. अनेक लोक या दु:खातून गेलेत, अनेक जात आहे., अनेक पुढेही जातील. पूर्वीच्या काळी वैद्यकीय सेवेअभावी असले प्रकार  घडत  असावेत असे मानले तरी आजच्या काळात जर अशा प्रकारची संतती जन्माला  येत असेल तर त्याला काय  म्हणाव

बर आजही काही लोक अशिक्षित, असंस्कृत  आहेत त्यांच्या वाट्याला असला   प्रकार आला तर आपण म्हणू  शकतो कि अज्ञानामुळे  त्याचं  काही  चुकल   असेल. पण आईवडील चांगले सुसंस्कृत, बुद्धिमान, असूनही जर त्यांच्या  पोटी एखादे मतीमंद, खुळे , वेडे, मुल जन्माला येत असेल तर ? 
  
या प्रश्नावर येवून मती कुंठीत होते, काही लोक याला अपवाद म्हणतील, अपवादात्मक गोष्टी घडतच असतात. पण या पाठीमागे  खरच काही कारण  असतील तर अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

अशा प्रकारे  मुल जन्माला  आले तर आयुष्यभर दु:ख भोगाव लागत . त्या मुलाची सेवा करावी लागते. आयुष्य जगण्यातील आनंद हिरावला जातो . 

भारतीय ऋषीमुनींनी या बाबतीत सखोल चिंतन करून त्याबद्दल काही नियम केलेले आहेत. या नियमांचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा किंबहुना केलाच पाहिजे. 

अशी मुले कश्यामुळे जन्माला येतात याच रहस्य त्या मुलाच्या  कुंडलीतील  ग्रहयोगाच्या  माध्यमातून दिसून येते. मतीमंद आणि खुळी संतती  होण्याच  कुठलही  स्पष्ट कारण माता पित्यांच्या कुंडलीत दिसत नाही. 

पूर्वीच्या काळी राजघराण्यात , विद्वान कुटुंबात मनोवांच्छित संतती करिता विधीपूर्वक कर्म केले जात असे. त्याचे रिझल्ट्स सुद्धा तसेच चांगले मिळायचे.  

लोकांनी आजकाल ब-याच  चांगल्या गोष्टी ज्या षी मुनींनी सांगितल्या होत्या त्याही कर्मकांड म्हणून बाजूला सारल्या आहेत किंवा दूर केल्या आहेत.
 

अष्टमी ,  ग्रहण काळ, अमावस्या, पोर्णिमा, या तिथी गर्भधारणेच्या दृष्टीने   अयोग्य, अशुभ असतात.

1 तुकालाच्या  तीन  रात्री
२ अमावस्या
३ पौर्णिमा
4 एकादशी
५ प्रदोष काल
६ ग्रहण काल
७ कुटुंबातील
श्राद्ध विधी
पर्वाच्या दिवसात

उगाच विषाची परीक्षा न पाहता वरील  सांगितलेला कालावधी टाळा व  शिस्त पाळा नाहीतर आयुष्यभर न संपणार दु:ख  वाट्याला येऊ शकते .

 शुभं भवतु

आपला
नानासाहेब

Tuesday 21 August 2012

जगी सर्व सुखी असा कोण आहे ...?

!! श्री !!
नमस्कार मित्रहो

काल  एका जातकाची   कुंडली  बघितली . कुंडलीचा  अभ्यास   चालू  असताना  त्या   पत्रिकेतील  विशेष  बाब  जी  नजरेस  आली .  तिचेच  विश्लेषण  करतोय .  जातकाचा   प्रश्न  विवाह  संबंधी  होता  त्याच  उत्तर दिल्यानंतर माझ इतर गोष्टींकडे लक्ष गेल अन चमकलोच. त्याची कुंडली मी बाजूला दिलेली आहे. गुप्ततेमुळे नाव वगैरे काढून टाकलय. अर्थात हा काही खूप खाजगी विषय नाही म्हणून मी तो ब्लॉग वर टाकत आहे.  

कुंडलीच निरीक्षण करताच लक्षात येईल कि पाच पाच ग्रह  तृतीयाचे कार्येश होतात. बुध, गुरु ,शुक्र , चंद्र तृतीयात, शनी तृतीयेश.  

जन्म १९८७ चा.  शनीची महादशा १९९१ ते २०१० पर्यंत कार्यरत. शनी व्ययात, द्वितीयेश, तृतीयेश तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात, बुध तृतीयात.  त्यानंतर येणारी महादशा केतूची, ती २०३४ पर्यंत कार्यरत आहे. केतू चंद्राच्या दृष्टीत, चंद्र तृतीयात - गुरूच्या नक्षत्रात, गुरु तृतीयात व  लग्नेश, केतू चंद्राच्या नक्षत्रात चंद्र तृतीयात. त्यानंतर येणारी महादशा शुक्राची, शुक्र तृतीयात, षष्ठेश, दशमेश व  लाभेश ,   तसेच शुक्र शनीच्या नक्षत्रात, शनी व्ययात, द्वितीयेश व तृतीयेश. हि महादशा २०५४ पर्यंत कार्येश.    

 त्यानंतर येणारी दशा रवीची ती २०६० पर्यंत कार्येश. रवी सप्तमात व नवमेश, रवी केतूच्या नक्षत्रात. केतू वरील प्रमाणे कार्येश.

एकंदरीत हि जंत्री बघता मी जातकाला विचारल कि या व्यक्तीच शिक्षण घराबाहेर दूर झाल का ? त्यांनी लगेच होकार दिला. आणखी पुढे सांगत मी म्हंटल. "हि व्यक्ती नोकरी सुद्धा घरापासून दूर राहूनच करीन. याला वाहन सौख्य कमी मिळेल"

त्यावर लगेच त्यांनी सांगितलं "हो आम्ही दोघे एकाच कंपनीत नोकरीला लागलो, पण काही महिन्यातच तो कंपनी सोंडून दुसरीकडे जॉईन झाला, शिक्षणातही त्याला अडचणी आल्या होत्या." 

माझ्या  समोर जे जातक बसले होते मी त्यांना विचारल " हे सगळ तुम्हाला कस माहित "
"कारण तो माझा चुलत भाऊच आहे." त्यांनी सांगितलं.
 
"याला वाहन सौख्य कमी मिळेल, राहती घर बदलतील. म्हणजेच गृह सौख्य कमी मिळेल" मी पुढे सांगितलं.
 
 "त्याला अजून निट गाडी चालवत येत नाही, खूप कमी वेळा तो गाडी वापरतो." 

"असच होणार अगदी २०६०  पर्यंत तो  प्रवास खूप करणार कारण त्याचा तृतीय भाव मजबूत लागलाय." मी विश्लेषण करून सांगितलं.

"ज्योतिष शास्त्र इतक्या खोलात जावून मार्गदर्शन करू शकत ? मला विशेष वाटतंय " तो म्हणाला.

"हो. अनेक गोष्टींचा मागोवा या शास्त्रातून घेता येतो. खरतर यात विशेष काहीच नाही. कोणीही व्यक्ती जी कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यासक आहे ती सांगू शकते. त्या व्यक्तीमध्ये काही दैवी शक्ती किंवा विशेष शक्ती असते अस नाही. हे उपकार ज्योतिष शिरोमणी  कृष्णमुर्तिनी करून ठेवलेत." त्याला सांगताना मला खरच आतून ज्योतिष मार्तंड कृष्णामुर्तींचा अभिमान वाटत होता. 

या कुंडलीच वैशिष्ट काय आहे कळल का ?  ज्या सुखासाठी मनुष्य आयुष्यभर धडपडतो, काबाड कष्ट करतो, एक नंबर दोन नंबर करतो तेच सुख जर माणसाला मिळणार नसेल तर......?  

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब


Tuesday 7 August 2012

विवाह ...? कधीच नाही...



|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

माझे एक जातक एका वृद्ध व्यक्तीबरोबर कार्यालयात आले. नमस्कार वगैरे करून इतर जुजबी बोलण झाल्यावर त्या जातकाला विचारल.

"बोला..  कोणाची समस्या आहे?"

"यांच्या मुलीचा विवाह योग कधी आहे ते सांगा ." त्यान त्या वृद्धाकडे बोट करत म्हंटल.

"आज नाही सांगू शकत." मी त्यांना त्या वेळेस खरच वेळ देवू शकत नव्हतो.

"अस नका करू खूप अर्जंट आहे, तस नसत तर यांना मी घेवून नसतो आलो. मला एकट्यालाही येता  येत होत. पण आपल्या  भेटीची वेळ अगोदर न घेतल्यामुळेच  मी यांना घेवून आलो." वृद्धाने विनंती केल्यावर मग नाईलाज झाला, मी माझ्या हातातील काम बाजूला ठेवले.

"माफ करा,  पण  अस मधेच येणा-याला जर मी वेळ दिला तर आधीच्या जातकांच काम माग पडत. म्हणून मी नाही म्हणतो इतकच" मी माझी अडचण सांगितली.

"खर तर फोन करूनच येणार होतो पण तुमच्या बद्दल यांनी इतक सांगितलं कि मग वाट पाहण्याचा धीर धरवला नाही. कारण तुम्ही आठ, पंधरा दिवसा नंतरची वेळ दिली  असती व इतके दिवस   थांबण   मला आता शक्य नाही." वृद्धाने खर काय ते सांगितलं.

मी अधिक न बोलता त्यांच्या मुलीची भाव चलित कुंडली मांडली.

पत्रिका बाजूला दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

सध्या  जाताकास  गुरूची  महादशा सुरु असून ती २०१५ पर्यंत कार्येश आहे. गुरु तृतीयात, व्ययेश तसेच लग्नेश आहे. गुरु रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात, रवीची सिंह राशी लुप्त. गुरूची दृष्टी अष्टम, दशम व व्यय स्थानावर. म्हणजेच  गुरु हा ग्रह कुठल्याच प्रतीने विवाहाचा कार्येश नाही. त्या नंतर येणारी महादशा शनीची आहे ती २०३४ पर्यंत कार्यरत आहे. शनी षष्टात  व लग्नेश आहे तसेच  शनी  बुधाच्या नक्षत्रात, बुध व्ययात, षष्टेश  व अष्टमेश आहे. शनीची दृष्टी नवम , लग्न व चतुर्थावर आहे. त्यामुळे शनी सुद्धा विवाहाचा कुठल्याही प्रतीचा कार्येश होत नाही. 

सध्या मंगळाची अंतर्दशा सूरु आहे ती ऑगस्ट  २०१२ पर्यंत कार्येश आहे.  मंगळ  रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात. त्यामुळे हि अंतर्दाशाही काही कामाची नाही. पुढे येणारी अंतर्दशा राहूची आहे. राहू सुद्धा गुरूच्या दृष्टीत त्यामुळे हि अंतर्दशा सुद्धा विवाहासाठी पोषक नाही. हि अंतर्दशा २०१५ पर्यंत कार्येश आहे. त्यानंतर शनीची महादशा लागेल. शनी महादशेत तीन वर्ष शानिचीच अंतर्दशा राहील. तोपर्यंत २०१८ येईल. मग बुधाची अंतर्दशा लागेल.ती सप्टेबर २०२०  पर्यंत आहे. आता बुध कसा कार्येश होतो ते पाहू. बुध व्ययात, षष्टेश , अष्टमेश आहे तसेच बुध रवीच्या नक्षत्रात, रवी लग्नात. म्हणजे हि अंतर्दशाही लग्नासाठी उपयोगाची नाही. तोपर्यंत मुलीच वय ४३ होईल.

 वरील जंत्रीवरून एक लक्षात आल कि जातकाच्या तीनही महादशा विवाह घडवून आणण्यास पोषक नाहीत व एकही अंतर्दशा बलवान नाही.

आता मी सप्तम स्थानावर लक्ष केंद्रित केल. सप्तमात एकही ग्रह नाही. सप्तमाचा अधिपती चंद्र आहे. चंद्राच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही. चंद्राच्या उप नक्षत्रात फक्त केतू आहे. केतूची महादशा २०५१ नंतर सुरु होईल. त्यावेळी मुलीच वय ७४ असेल म्हणजे विषयच संपला. मग केतूच्या अंतर्दशेत विवाह होईल का. ?

केतूची अंतर्दशा २०१५ नंतर सुरु होईल. मग मी केतू कसा कार्येश होतो ते पाहिलं.

केतू द्वितीयात, केतू मंगल व शनीच्या दृष्टीत, म्हणजेच केतू हा सप्तमाचा अगदीच मजबूत कार्येश होत नाही. त्यामुळे या दशेतही लग्न होणार नाही.  जर  केतू दशाही  लग्नास  कारक  नाही  तर  मग याचा  अर्थ  अगदी  स्पष्ट  आहे. लग्न  होणार नाही.

मी गंभीर झालो. आता हि गोष्ट त्या वृद्ध पित्याला सांगण मला खूप जड गेल.

मी त्यांना सांगितलं. "मुलीच्या पत्रिकेत विवाह योग नाही."

"काय???" त्यांना  एकदम धक्काच बसला.

"होय,  पण तुम्ही प्रयत्न करू शकता, देव करो न माझ भविष्य चुको" मी त्यांना थोडा धीर देत म्हणाला. शेवटी काय तर डॉक्टर हि अगदी शेवटच्या वेळेस रुग्णाच्या नातेवाईकांना  असच सांगतात , अब  दवा कि नही दुवा कि जरुरत हैं.

थोडावेळ सुन्न अवस्थेत गेला. नंतर ती व्यक्ती सावरली. अन म्हणाली "गेल्या दहा  वर्षांपासून मी मुलीच्या लग्नासाठी  प्रयत्न करतोय. सगळ्यांनीच मला सांगितलं कि या वर्षी लग्न होईल. पुढच्या वर्षी होईल पण नाही झाल  हो. अस का ?"

या काच उत्तर मला माहित आहे. पण मी त्यांना ते समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही........

"प्रेम विवाह, अंतर जातीय अस काही आहे का? कारण ती कॉलेज ला प्रोफेसर  आहे   म्हणून   म्हंटल  " त्यांनी अंधुक आशेन विचारल.

"नाही. विवाहाचा  योगच नाही" मी जास्त खुलासा न करत सांगितलं. 

"याला काही उपाय ?" त्यांनी पुन्हा विचारल.

नाही. याला काही उपाय नाही. आडात नसेल तर पोहो-यात कुठून येणार. उपाय तेंव्हाच फलित होतात जेंव्हा त्या विषयाबद्दल काहीतरी  स्पार्क असेल. अन्यथा सर्व उपाय निरुपयोगी ठरतात.

"ठीक आहे. दैवाच्या मनात जे असेल ते होईल" अस म्हणत ते उठले. ....

शुभं भवतु !


आपला
नानासाहेब