Wednesday 23 January 2013

व्यवसायात झटका कोटीचा फटका ?

।। श्री ।। 

 नमस्कार मित्रानो  !

बाजूला ज्याची   कुंडली दिलेली आहे त्या व्यक्तीला तो जो नवीन व्यवसाय सुरु करू इच्छित होता त्याबद्दल  मार्गदर्शन हव होत.त्या कुंडलीवर क्लिक करताच ती वाचण्या योग्य मोठी होईल.


सध्या कुंडलीला  गुरूची महादशा व बुधाची अंतर्दशा सुरु आहे. महादशा २००७ ते २०२३ पर्यंत आहे व बुध अंतर्दशा -  मे २०१४ पर्यंत आहे. नंतर केतूची अंतर्दशा  लागेल .

गुरु अष्ठ्मात, चतुर्थेश आहे, गुरु केतूच्या नक्षत्रात, केतू दशमात, केतूवर  शनीची दृष्टी चतुर्थात, द्वितीयेश व तृतीयेश, शनि बुधाच्या नक्षत्रात, बुध तृतीयात व दशमेश आहे. तसेच केतू राविच्याही दृष्टीत आहे. रवि चतुर्थात व नवमेश, रवि बुधाच्या नक्षत्रात व बुध वरील प्रमाणे कार्येश. केतू  मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ  पंचमात,  व्ययेश व लग्नेश आहे. केतू बुधाच्या राशीत बुध वरील प्रमाणे कार्येश व बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु अष्ठमात व चतुर्थेश.

वरील जंत्री खालील प्रमाणे कार्येश होईल.

गुरु ८   ४                 नक्षत्रस्वामी केतू  १०  
दृष्टी शनि ४  २  ३     नक्षत्रस्वामी बुध ३  १०
दृष्टी रवि ४  ९           नक्षत्रस्वामी बुध ३  १० 
नक्षत्रस्वामी  मंगळ ५  १२  १
राशीस्वामी बुध ३  १० नक्षत्रस्वामी गुरु ८  ४

मित्रानो  हि कुंडली  एका बांधकाम व्यवसायकाची आहे. केतू वर शनीची दृष्टी  असून शनि चतुर्थात आहे. तसेच तो बुधाच्या नक्षत्रात, बुध ३ १० चा बलवान कार्येश, त्यामुळे कष्टमर चिकार, अनेक  "Flat system" चे प्रोजेक्ट त्याने यशस्वी केलेत.

आपण  अस म्हणू कि गुरु च्या दशेत त्याला यश मिळाल, चांगला पैसा मिळाला कारण आजच्या काळात तृतीय भाव सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा भाव आहे.  पूर्वीच्या काळी तृतीय भावाला फारशी किमत  नव्हती पण आज  मात्र तृतीय भाव फॉर्म  मध्ये आहे. असो !

गुरु जसा ३, १० चा बलवान कार्येश आहे तसाच तो ५, १२, ८ चा सुध्दा मजबूत कार्येश आहे. आता पाच, बारा, आठ लागल्यानंतर भल्या भल्यांची  कशी वाट लागते हे   के. पी. च्या अभ्यासकांना माहित आहे.  भले मग तो कितीही शहाणा असो.

सध्या  बुधाची अंतर्दशा चांगली जात आहे कारण बुधाचा  उपनक्षत्र स्वामी शुक्र  ६,  ७,  ११ चा कार्येश आहे. त्यामुळे आणखी एक नवीन व्यवसाय करण्याची इच्छा निर्माण  झाली. पण बुध अंतर्दशा कितीही चांगली असली तरी पुढे येणारी केतूची अंतर्दशा त्याच नुकसान करणार कारण केतू ५,  १२,  ८ चा बलवान कार्येश होणार आहे.

पुढे येणारी केतूची  अंतर्दशा खरच नुकसान करणार का ? याची खात्री करण्यासाठी मी गुरु महादशेवर लक्ष केंद्रित केल. गुरु महादशा २००७ ला सुरु झाली, गुरु केतूच्या नक्षत्रात आहे म्हणजेच गुरूची दशा लागल्या लागल्या या व्यक्तीला जबरदस्त नुकसान झाले असेल यात काही शंका नाही.? 

मग मी त्या बिल्डरला विचारल "२००७ ते २००९ या काळात तुम्हची काही आर्थिक  हानी झाली का ?"  

तर तो  म्हंटला "माज्या आजवरच्या आयुष्यात सगळ्यात  मोठ नुकसान  २००७ ते २००९ च्या दरम्यानच  झाल आहे. एक कोटी रुपयाच्या आसपास नुकसान झालय"

गुरूची दशा सुरु झाल्या झाल्या या व्यक्तीला एका प्रोजेक्ट मध्ये जवळ पास कोटी  रुपयांचा फटका बसला. कोटी रुपयाच नुकसान होण  म्हणजे बाजारात रुपया हरवण नव्हे. 

२००९  नंतर पुन्हा गाडी रुळावर आली. आता सर्व मार्गी लागून नवीन  Drinking Water चा प्लान आहे. जवळ जवळ ५० ते ६० लाखाच्या आसपास गुंतवणूक करावी लागेल ? करू का  नको ? हा  खरा प्रश्न आहे.

येणारी  केतूची दशा पुन्हा  एकदा याला झटका देणार याची खात्री झाली. मी म्हंटल " गुंतवणूक करायची  कि नाही  ते तुमच तुमी ठरवा, पण २०१४ ते २०१५ या दरम्यान  आर्थिक हानी होणार म्हणजे होणार त्या दरम्यान डोळ्यात तेल घालून व्यवसायात लक्ष घाला व जेव्हढ वाचवता येईल तेव्हढ वाचवायचं  बघा अन्यथा थांबून घ्या व २०१५ नंतरच नवीन व्यवसाय सुरु करा."


शुभं भवतु  !

आपला 
नानासाहेब 

Friday 4 January 2013

रूलींग ग्रह आणि अचूकता ...

नमस्कार

काल  सकाळी ऑफिसला येताना  सुलेखा   डॉट कॉम च्या मार्केटिंग च्या माणसाचा फोन आला. तुमची जाहिरात द्या अशी अशी ऑफर चालू आहे, अशान अस होईल वगैरे वगैरे.

म्हंटल "मला त्याची गरज नाहीये, मी  जाहिरात देणार नाही." 
तो म्हंटला "जाहिरात द्यायची किंवा नाही हे नंतर ठरवा  आमची ऑफर तर ऐका, मी आमचा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर तुमच्याकडे  पाठवतो"

ओके ! पाठव अस म्हणून मी ऑफिसला आलो सकाळच्या  दोन कन्सलटन्सी आवरून बसलोच होतो इतक्यात त्या  बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरचा फोन आला. त्यावेळी तो माझ्या ऑफिस पासून २५ - ३०  किलोमीटर दूर  कुठेतरी होता. त्याने माझा पत्ता घेतला व  येतोय अस म्हणून  फोन ठेवला.

नंतर दहाएक मिनिटे आजची  पेंडिंग कामं काय काय आहेत ती  पाहीली.  इतक्यात मला आठवल नेट  कनेक्टर रिचार्ज करायचं आहे, नवीन वर्षाच पंचांग घ्यायचय, माउस मध्ये मध्ये बंद पडतो तो बदलायचा आहे. म्हणजे बराच वेळ जाणार. त्यात त्या बहाद्दरान कधी येणार काय हे काही सांगितलं नव्हत.  तशी मला त्याची चिंता  करायचं काही कारण नव्हत. आला तर वाट पाहत बसेल. पण मला अस कुणाला  ताटकळत ठेवण आवडत  नाही. 

म्हंटल चल रुलिंग ग्रहांचा उपयोग करूया. हा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर  किती वाजे पर्यंत  येणार ते पाहू.

कालची  तारीख .३.०१.२०१३ वेळ ११.३१ सकाळी
            रूलींग ग्रह
लग्न मीन        - स्वामी गुरु
चंद्र नक्षत्र पूर्वा  - स्वामी शुक्र
चंद्र राशी सिंह  - स्वामी रवि
वार गुरुवार     - स्वामी गुरु

प्रश्न वेळेस मीन हे द्विस्वभावी लग्न सुरु होते. म्हणजे याची येण्याची  वेळ  बदलू शकते. त्यामुळे त्याच्या येण्याबद्दल काही शंका निर्माण झाल्या त्या अशा...

एकतर हा लंचून  येईल किंवा लंच न घेता  येईल,  बाईकवर येईल किंवा बसने,  सध्या महामार्ग विस्तारीकरणाच काम जोरात सुरु आहे. त्यामुळे ब-याचदा ट्राफिक जामला तोंड द्याव लागत वगैरे 

मीन हे लग्न सकाळी ११:१५ ते १२:५१ पर्यंत, मीनेत गुरु , शनि व बुधाची नक्षत्रे आहेत,  मी रुलिंग घेतलं ती वेळ ११:३१.  त्यावेळी गुरूच नक्षत्र संपून शनीच सुरु झाल होत. शनि ,बुध रुलिंग मध्ये नाही.  त्यानंतर मेष लग्न सुरु होईल , मेषेचा स्वामी मंगळ  रुलिंग मध्ये नाही. मेष लग्न २:३६ पर्यंत, नंतर वृषभ लग्न सुरु होईल. वृषभेचा स्वामी शुक्र रूलींग  मध्ये आहे. वृषभेत रवी, चंद्र व मंगळाची नक्षत्र येतात. त्यापैकी रवि रुलिंग मध्ये आहे. त्याची व्याप्ती  १:१३:२० ते ३:०:० अशी आहे. त्यात गुरूचा सब  आहे. गुरु रुलिंग मध्ये आहे. म्हणजेच वृषभ  लग्नी शुक्राच्या नक्षत्रात व  गुरूच्या सब मध्ये तो 'बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर' येणार. वृषभ लग्न २:३७ ला सुरु  झाले ते लग्न ३ अंशावर अंशावर येईल त्यावेळी ती  व्यक्ती येईल. २:३७ मध्ये ३ अंश  मिळवले. २:४९ ला तो यायला पाहिजे.

म्हणजे त्याला यायला बराच  अवधी आहे. पण मीन लग्न द्विस्वभावी असल्यामुळे आणखी एक वेळ निश्चित करायला हवी. पण कोणती ? कारण मीनेत गुरु, शनि, व बुधाची नक्षत्र आहेत, शनि बुध रुलिंग मध्ये  नाहीत.  नाहीत ...?   अहो बुध रवि धनेत होते. बुध रवीच्या युतीत. म्हणजेच बुध सुद्धा रुलिंग ग्रह होतो व मीनेत बुधाच नक्षत्र आहे. म्हणून मीन लग्नी,  बुधाच्या नक्षत्रात व शुक्राच्या सब मध्ये 'ती व्यक्ती येईल' . शुक्र का  घेतला तर शुक्र प्रथम प्रतीचा आहे म्हणून. शुक्राचा सब १९:२०:० ते २१:३३:२० विकला पर्यंत  आहे. म्हणजेच ११:१६ मध्ये २१ अंश मिळविले तर १२:४० ला ती व्यक्ती येणार अस म्हणायला हरकत  नाही. पुढील  सब सुद्धा रवीचा आहे व रवि सुद्धा रुलिंग मध्ये आहे. म्हणजे १२:४० ते १२:५०  या दरम्यान तो  'बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर' यायला  हवा.

वरील प्रकारे मी दोनी वेळा निश्चित करून व ऑफिस मधून आता १२:५० नंतरच बाहेर पडू असा विचार करून मी इतर कामात गुंतलो.. 

बरोबर १२:४९ ला त्यान फोन केला "तुमच ऑफिस कुठे आहे ? मी आलोय."
म्हंटल "एन. डी. सी समोर"
मी केबिन च्या बाहेर पाहिलं एक तरुण  फोन बंध करून इकडेच येत होता. १२:५० ला तो केबिन मध्ये आला व त्यान त्याच बिझनेस कार्ड माझ्या टेबलवर ठेवत तो म्हंटला  "मी गणेश कदम, सुलेखा डॉट काम कडून  आलोय.......... "     

आपला
नानासाहेब