Sunday 2 November 2014

व्यवसाय भविष्यात कसा राहील ? success in business



नमस्कार मित्रानो

ब-याच कालावधीनंतर लिहिण्यासाठी वेळ मिळाला. म्हणून लिहितोय. अर्थात सध्या कुंडली मध्ये काही विशेषता: जाणवली कि मगच मला लिहायला बर वाटत. असो.

मागे एकदा असाच एका परीचीताचा फोन आला. मला म्हणाले माझे एक स्नेही जरा अडचणीत आहेत त्यांना वेळ द्या. मीही त्यांच्या सोबत येतोय.

सायंकाळी ठरल्या वेळेवर ते आले. मी त्यांची कुंडली मांडली जरा निरीक्षणं केल्यावर त्यांना विचारल तुम्ही जमिनी संबंधी काही व्यवसाय करता का, म्हणजे बांधकाम, जमीन खरेदी विक्री वगैरे  ?

ते म्हंटले हो... पण तुम्ही कस ओळखल ?

मी म्हंटल हे काही विशेष नाही. आमच्या शास्त्राचे कोणीही अगदी सुरुवातीचे अभ्यासक सुद्धा अशा गोष्टी सांगू शकतात. तुम्ही तुमचे प्रश्न काय आहेत ते विचारा?”.

त्यांनी त्यांचे प्रश्न विचारले. त्यावर आमची चर्चा झाली. त्याबद्द्ल मी इथे काही सांगत नाही. त्यांच्या एका प्रश्नावर वर आपण फोकस करू. त्यांनी त्यांचा व्यवसाय भविष्यात कसा राहील 
याबाबत विचारणा केली.

ती कुंडली बाजूला देत आहे. त्या कुंडलीवर टिचकी मारून मोठी करून पाहता येईल. अर्थातच मी जातकाचे नाव गुप्त ठेवण्यासाठी कुंडलीतून काढून टाकले आहे.


वर सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे ते बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय ते करतात.  हाच व्यवसाय ते का करतात बघू या.....

दशमाचा उपनक्षत्र स्वामी राहू असून तो नवमात आहे. राहू रवीच्या दृष्टीत, रवी तृतीयात, लग्नेश व द्वीतीयेश, रवी चित्रा नक्षत्रात, मंगळ पंचमात व चतुर्थेश, राहू मेषेत.  

दशमाचा उप नक्षत्र स्वामी मंगळाचा व चतुर्थ भावाचा कार्येश झाला आहे.

दशास्वामी शनी २००८ ते २०२९ पर्यंत कार्येश आहे. म्हणजेच शनीची महादशा आहे.
दशास्वामी शनी ८, ६, ७  दशास्वामी शनी स्वनक्षत्रात असल्यामुळे नियमाप्रमाणे त्याचा उप नक्षत्र कार्येश होईल. दशास्वामी शनी , ,     उप नक्षत्रस्वामी राहू ९ दृष्टी रवी ३ १ नक्षत्रस्वामी मंगळ ५, , दृष्टी बुध ३, ३, ११, बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु १,५,९.  राहू केतूच्या नक्षत्रात. केतू ३ , युती रवी ३ १ नक्षत्रस्वामी मंगळ ५, ४, राशी स्वामी शुक्र १, १०, नक्षत्रस्वामी गुरु १,५,९

वरील प्रमाणे दशा स्वामी शनीचे कार्यश्वत्व बघता असा लक्षात येईल कि शनीच्या नक्षत्रात एकही ग्रह नसल्यामुळे व शनी ज्या भावांच प्रतिनिधित्व करतोय त्या भावात एकही ग्रह नाही त्यामुळे शनी ८, ६, ७  या भावांचा बलवान कार्यश झाला व राहूच्या माध्यमातून २,४,६,७,८,१०,११ या भावांचाही मजबूत कार्येश झालाय.  

वरील विश्लेषणाचा अभ्यास झाल्यानंतर मी त्यांना म्हंटल कि आणखी पुढील १३ वर्ष तुम्ही करोडो रुपये  कमावणार. एकाच वेळी २, ६, १०, ११ कार्येश झाल्यानंतर काय होणार हे अभ्यासकांना सांगायला नको. नाही का ?

आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का ? दशास्वामी शनी अष्टमात असून जलतत्वाच्या राशीत आहे. आहे कि नाही चमत्कार ?

मी त्या जातकाला विचारल तुम्ही जमिनीखालील बांधकाम करता का ? जसे भूमिगत गटारी वगैरे?तर त्याने काय उत्तर दिल असेल ?

हो मी जमिनी खाली बांधकामही करतो. खर म्हणजे माझ्या व्यवसायातील एक प्रमुख घटक तोच आहे. परंतु सध्या तरी गटारी वगैरे नाही तर पेट्रोल पंपाचे बांधकाम, दुरुस्तीचे काम करतो.

आता कळलं का ? मी चमत्कार का म्हंटल ते ? अहो शनी तेलाचा कारक नाही का ?  अर्थात नसेल लक्षात आल तरी हरकत नाही. पेट्रोल पंपाच मलाही क्लिक झाल नव्हत. असो.

एकूण काय तर हि व्यक्ती याच व्यवसायात चिकार पैसा कमावणार आहे.

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब

Sunday 2 March 2014

वैवाहिक सौख्य कसे राहील ? married life problems

नमस्कार मित्रानो !

परवा एक जातक विवाह विषयी प्रश्न  विचारण्यासाठी आला.  त्याने सोबत एक कुंडली सुद्धा आणली होती.  मी  त्याच्या कडची पारंपारिक कुंडली पाहून त्याला म्हंटले कि या कुंडली वरून विवाह योग सांगता येणार नाही.  मला कृष्णमुर्ती पद्धतीची कुंडली  लागते.  तुमच्याकडे नसेल  तर राहू द्या मी माझ्या संघनकावर तयार करून घेतो. जरा वेळ लागेल तो पर्यंत बसा.

ही कुंडली मी बाजूला देत आहे. टिचकी मारून ती मोठी करून बगता येईल. जातकाची इतर माहिती गोपनीयतेमुळे काढून टाकली आहे. 

मी कुंडली तयार करून त्यातील वैवाहिक सौख्य कसे असेल विवाह योग कधी आहे वगैरे गोष्टीं अभ्यासायला सुरवात केली अन  बसलेल्या जातकाला   काय सांगावे हा प्रश्न पडला.  बहुतेक मला पडलेला पेच त्याला कळला असावा. तो म्हंटला "तुम्ही अगदी बिनधास्त सांगा जे काही असेल ते. तुम्ही शुगर कोटेड काही सांगत नाही म्हणूनच तुमच्याकडे आलो"

"शुगर कोटेड वगैरे मला सांगता येत नाही. जे आहे तेच सांगायला लागत. " अस म्हणून मी त्याला कुंडली समजावून सांगायला सुरुवात केली तर तो मध्येच मला थांबवत म्हंटला "मला कुंडलीतल काही कळत नाही त्यामुळे मला त्यातल्या तांत्रिक बाबी नाही सांगितल्या तरी चालतील, मला फक्त एव्हढंच सांगाल  लग्न होणार आहे का ?, आज माझं वय ३५ आहे. आणखी किती वर्ष प्रयत्न करू ?, गेल्या सहा  सात वर्षापासून लग्न योग आहे म्हणतात पण लग्न जमत नाही " त्याच्या या बोलण्यातून प्रचंड निराशा जाणवत होती. 

"तुम्ही लग्न करू नका " मी एका वाक्यात त्याला कुंडली सांगितली. 

"काय ?"  त्याला विस्मय वाटला असावा बहुतेक 

" तुमच्या कुंडलीत विवाहाचे योग नाहीत. आणि समजा अपवादात्मक परिस्थितीत लग्न झालंच तरी वैवाहिक सुख अत्यल्प असल्यामुळे दोन तीन  महिन्याच्या वरती हे लग्न टिकणार नाही" 

"अहो अस कस ?, मला सरकारी नोकरी आहे , स्व:ताच घर दार आहे तरी लग्न होणार नाही ?" त्याला नाही म्हंटल तरी प्रचंड  धक्काच बसला. 

"रतन टाटांकडेहि घर दार , गाडी वगैरे सगळं आहे,    तरी लग्न मात्रं झालं नाही, अगदी भिक-यांचेही लग्न होतात पण नवकोट नारायणाच राहून जातं .  " मी त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी बोललो. 

सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी बुध पंचमात व पंचमेश, शनीच्या नक्षत्रात, शनि षष्ठात, लग्नेश व व्ययेश आहे बुध कुठल्याच प्रतीने विवाहाचा कार्येश होत नाही .

शुक्र दशा २०१२ ते २०३२ पर्यंत.  दशास्वामी शुक्र  षष्ठात, अष्टमेश व तृतीयेश, शुक्र केतूच्या नक्षत्रात, केतू व्ययात, केतू शनीच्या राशीत, शनि षष्ठात, व्ययेश व लग्नेश, शनि शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र वरील प्रमाणे कार्येश. या कुंडलीतील शुक्र, शनि , रवि, चंद्र, राहू, केतू , बुध हे सर्व ग्रह षष्ठ व व्यय या वैवाहिक सौख्य  बिघडवना-या भावांचेच बलवान कार्येश आहेत.त्यामुळे दशां स्वामी शुक्र त्याच्या संपूर्ण दशा कालात वैवाहिक सौख्य मिळू देणार नाही. त्यामुळे लग्न करून दुस-या व्यक्तीच्या आयुष्याची वाट लावण्यात काय अर्थ आहे. 

"मग इतर लोक मला दरवर्षी विवाह योग आहे अस खोट का सांगतात?" त्याने त्याचा मनातला सल सांगितला 

अभ्यासकांनी लग्न कुंडली नीट बघावी. लग्न कुंडलीत  शुक्र, रवि शनि व राहू हे चार ग्रह सप्तमात आहेत, सप्तमेश सप्तमात आहे त्यामुळेच लग्न योग दिसतो. परंतु भावचलित बघितल्यावर मात्र हा गैरसमज दूर होईल व कृष्णमुर्ती पद्धतीत भावचलित कुंडलीला महत्व का देतात ते कळेल.   

तो निराशेनेच उठला. मला त्याच्याकडे बघून वाईट वाटत होतं पण….  नाईलाज को क्या इलाज ? … 

"समजा चुकून लग्न झालच तर ?" जाता जाता त्यानं विचारल . 

"जेव्हढ सुख मिळेल तेव्हढ आनंदाने उपभोगा, बाकी जे होईल ते होईल  … लढते रहो  " अस म्हणून मी त्याला निरोप दिला

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब