नमस्कार मित्रहो
आयुष्यात ऐन तारुण्यात संघर्षाचा कालावधी असेल व तो काही वर्षाकरिता
असेल तर हरकत नाही. परंतु तो कालावधी निवृत्तीच्या वयापर्यंत असेल तर...
खालील कुंडली टिचकी मारून बघा. कुंडलीतील जातकाचे नाव गुप्ततेसाठी
काढून टाकले आहे.
या कुंडलीला सध्या बुधाची दशा सुरु आहे ती 2022 पर्यंत असेल.
दशास्वामी बुध शनीच्या उ.भाद्रपदा नक्षत्रात. शनी अष्टमात, अष्टमेश
व नवमेश आहे. दशा स्वामी अष्टम भावाचा व नवम भावाचा बलवान कार्येश झाल्यामुळे या कालावधीत
शिक्षणात अडचणी येतील, हा जातक इंजिनियरिंग मधील शाखेत शिक्षण घेईल. परंतु शिक्षण पूर्ण
करताना एक ते दोन वर्षे जास्त लागतील.
अर्थात या कुंडलीचा फार खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरजच नव्हती.
जातकाने मला व्यवसायबद्दल प्रश्न विचारला होता पण कुंडलीचे निरीक्षण करताना जातकाच्या
शिक्षणाची स्थिती कसे असेल याची कल्पना आली. तस मी त्याला विचारताच त्यांन विषय राहिल्याच
सांगितलं.
दशास्वामी बुध अष्टम कार्येश असल्यामुळे व्यवसायात आर्थिक नुकसान
होणार हे नक्की परंतु नवमाचा कार्येश असल्यामुळे व्यवसायात बदल सुद्धा होतील. स्थिरत्व
येणार नाही.
मी त्याला नुकसानी बद्दल विचारताच त्यानं सांगितलं की त्याचे आतापर्यत 20 ते 25 लाख रुपयांचा व्यवसायात घाटा झाला. नवीन कर्ज काढून व्यवसाय पुढे चालू ठेवू
कि बंद करू असा त्याचा प्रश्न होता.
मी त्याच्या पुढील येणाऱ्या महादशा बघितल्या. त्या दशा बघितल्यावर
काय बोलावे कळेना. पुढील सर्व दशा म्हणजे केतू , शुक्र , रवी शनीच्याच नक्षत्रात. म्हणजे
अष्टम व नवम भाव निवृत्त होई पर्यंत बलवानच राहतील. म्हणजेच स्वतंत्र व्यवसाय करून
फायदा होणार नाही. पण पुढे आयुष्य कस चालायचं.
मी त्याला व्यवसाय न करण्याचं सांगितलं. परिस्थिती समजून सांगितली. तो सुन्नच झाला, म्हंटला यावर काही उपाय नाही का ?
मी त्याला उपाय सांगितला व भागीदारीत 20 ते 30 टक्यांनी व्यवसाय
करायला सांगितला. यानंतर जवळ जवळ एक वर्षांनी तो आला होता. त्याच्या भागीदाराला घेऊन. आता त्याच बर चाललंय म्हणाला.
शनी अष्टम भावाचा जर मजबूत कार्येश होत असेल तर तो कर्जबाजारी करून
स्थावर जंगम मालमत्ता विकायला भागच पाडतो.
हा अनुभव अनेक जातकांच्या बाबतीत खरा झालाय.
शुभं भवतू ।
आपला
नानासाहेब