Friday 22 June 2012

बदली होईल का ?

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

बोरीवलीहून दीप्तीचा फोन आला "सर मी तुमच्या खात्यावर फी जमा केली आहे. माझ्या बहिणीच्या काही अडचणी आहेत त्या बघा". दीप्ती म्हणजे आधी फी ट्रान्स्फर करणार मग  इ-पत्राने जे काही कोणाचे प्रश्न असतील ते. 

दीप्तीच  इ पत्र  एप्रिल महिन्याच्या २८ तारखेला  मिळाल.  बहिण वैशालीच्या  संदर्भात. ती सरकारी नोकरीत नुकतीच रुजू झाली. पण पोस्टिंग मात्र कुठे मिळाव तर औरंगाबाद. आता ?  झाली का पंचायीत ? संसाराच  बस्थान सगळ मुंबईत.  अन अश्यात नोकरीच्या निमित्तानं स्थलांतर. हरे राम s s ...  सगळच  विस्कळीत. नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर, तेही सरकारी म्हंटल्यावर तात्काळ बदली होण अवघडच. जे ह्या अनुभवातून गेलेत तेच या त्रासाच मुल्यांकन करू शकतात.    नको त्याच तोंड पाह्यला लागत. फालतूतल्या फालतू माणसालाही विनंत्या कराव्या लागतात. संताप, चीड आणि तीही व्यक्त  करता   येत नाही हि आपली मजबुरी एव्हढच काय ते आपल्या हातात.... अर्थात हि सगळी झाली बाहेर बाहेरची कारणं.    खरा प्रकार मात्र वेगळाच असतो. ... आवो देखते है  ग्रहों  का खेल..... 


प्रश्न : सर !.. गेल्या एक महीन्या पासून बदली साठी प्रयत्न चालु आहेत. पण अजुन यश येत नाही. कधी पर्यंत होइल ते सांगा. ?

बाजुलाच तिची पत्रिका दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल.

सध्या जाताकास गुरूची महादशा सुरु असून ती २०२३ पर्यंत कार्यरत आहे. गुरु  १२  ५  ८  तसेच गुरु केतूच्या नक्षत्रात केतू ६, केतू  मंगळाच्या दृष्टीत, मंगळ १२ ४  ९ , मंगळ केतुच्याच नक्षत्रात. 

अंतर्दशा शनीची सुरु असून हि दशा १३.०६.२०१२ पर्यंत कार्यरत आहे.  शनी १  ६  ७ शनी रवीच्या नक्षत्रात, रवी ६  १ 

वरील जंत्रीच सूक्ष्म अभ्यास करता अस  लक्षात  येईल कि नवमेश मंगळामुळे आधीच्या नोकरीत बदल. झाला. अंतर्दशास्वामी शनी रवीच्या माध्यमातून षष्टेश त्यामुळे सरकारी नोकरीची संधी मिळाली. व्ययेश मंगळामुळे पोस्टिंग दूर गावी मिळाली. 

अर्थात हे काहीही असो आपल्याला  महत्वाच काय ? बदली होईल काय ? होणार असेल तर कधी ? 

पुन्हा आपली जंत्री बघा.  मंगळ चतुर्थेश म्हणूनही बलवान आहे. चतुर्थ स्थान हे मातृ स्थान आहे. स्व ठिकाण. म्हणजेच बदली होऊन जातक पुन्हा आपल्या मूळ गावी येणार हे नक्की. पण केंव्हा बदली होणार ? जंत्री बघू या.... शनीची अंतर्दशा कौटुंबिक सौख्य कमी करणारी आहे. शनी अजिबात बदली साठी किंवा  मूळ गावी येण्यासाठी पोषक नाही. 

मग मी पुढची अंतर्दशा बघितली. १३ जून नंतर बुधाची अंतर्दशा लागणार. बुध ६  ११  २ असून बुध गुरूच्या नक्षत्रात, गुरु १२ ५ ८ . बुधाची दशा लाभात असून कौटुंबिक सौख्य वाढवणारी आहे.  त्यामुळे बुधापेक्षा गुरु बलवान असूनही बदली होणार व तीही १३ जून नंतर पहिल्या आठ दिवसात. 

फोन वर मी कुंडलीच विश्लेषण समजावून सांगत असताना दीप्तीला सांगितलं कि १३ जून नंतर बदली होणार व तेही आठ दहा दिवसात. अर्थात अस ऐकल्यानंतर लगेचच विश्वास नसेल बसला म्हणा दीप्तीचा... पण त्यावेळी मात्र मला धन्यवाद सर अस काहीस म्हणाली. अन नेहमी प्रमाणे कामाच्या रगाड्यात मी हि घटना विसरून गेलो. 

अचानक सतरा कि  अठरा तारखेला नक्की आठवत नाही पण सायंकाळी दीप्तीचा फोन आला. "सर बहिणीची बदली झाली. १७ तारखेला तीने मुंबईत ड्युटी जॉईन केली". त्यावेळी मी एका कंसलटन्सित व्यस्त होतो  म्हणून  सविस्तर बोलता आल नाही. 

शुभं भवतु !

आपला
नानासाहेब 

No comments: