Saturday 17 December 2011

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात..

नमस्कार !

आजकाल आपल्या लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल मला विचारणा होत असते. मुलगा किंवा मुलगी अगदी  बाळ  असतानाच म्हणजे २ ते ३ वर्षाची असतानाच असा प्रश्न विचारला जातो. आपल्याकडे एक म्हण अगदी खूपच जुनी आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ती म्हण काही खोटी नाही. जसे ते पाय पाळण्यात दिसतात तसेच कुंडलीतही दिसतात. म्हणजे ' हे बालक  आपले शिक्षण पूर्ण करू शकेल का? ' उच्च शिक्षण करणार का ? डॉक्टर, होणार कि कम्पुटर , सिविल इंजिनिअर वगैरे वगैरे.?'

अर्थात आता पुर्वीसारख फक्त शिकायचं एवढाच विषय राहिलेला नाही तर शिक्षणा नंतर कुठल करियर निवडाव हे नुसतच  महत्वाच नाही तर अत्यंत महत्वाच झालेलं आहे.

नाहीतर मेक्यानिकल  इंजिनिअर कुठेतरी साईटवर बांधकाम करताना दिसतो किंवा एखादा डॉक्टर कलाकार होतो नाहीतर हॉटेल चालवतो.  असो.

एका महिला जातकाने माझ्याकडे  आपल्या मुला बद्दल तक्रार केली. मुलगा फार त्रास देतो, तो कोणाचे ऐकत नाही वगैरे. अशा तक्रारी तशा नेहमीच्याच असतात. मी त्यांना तसा बोललोही. पण त्यांनी पत्रिकेत काही दोष आहे का ते बघा म्हणून सांगितलं. मुलाच वय चार वर्ष.  

मी त्याची कृष्णमुर्ती पद्धतीने  पत्रिका तयार केली. 
चतुर्थाचा सब गुरु केतूच्या नक्षत्रात केतू . केतू  शनीच्या दृष्टीत तसेच शुक्राच्या नक्षत्रात. शनी तृतीयात नवमेश व दशमेश  आहे. शुक्र पंचमात व षष्टेश. केतूचा राशी    स्वामी रवी असून रवी षष्टात व चतुर्थेश तसेच रवी बुधाच्या नक्षत्रात. बुध षष्टात, लग्नेश, पंचमेश.

सध्या जाताकास शुक्राची महादशा चालू आहे. शुक्र पंचमात तसेच षष्टेश. शुक्र राहूच्या नक्षत्रात. राहू पुन्हा शनिच्याच दृष्टीत व शनी शुक्राच्या नक्षत्रात. राहूचा राशीस्वामीहि शनीच. राहूचा नक्षत्रस्वामी बुध आहे व तोही पंचमेश आहे.
 शुक्राची महादशा २०२० पर्यंत आहे. नंतर रवीची महादशा रवी बुधाच्या नक्षत्रात व बुध पंचमेश. रवीची महादशा २०२६ पर्यंत.  त्यानंतर चंद्राची महादशा २०३६ पर्यंत आहे. चंद्र केतूच्या नक्षत्रात. केतू शुक्र व बुधाच्या  माध्यमातून  पंचमेश झालाय.  त्यानंतर मंगळाची महादशा आहे. ती २०४३ पर्यंत आहे. मंगल राहूच्या नक्षत्रात. राहू बुध व शुक्राच्या माध्यमातून पंचम. नंतर येणारी महादशा राहूची. ती २०६१ पर्यंत आहे. म्हणजे राहूच्या महादशेत वरील ग्रहच  कार्येश असणार. 

 हि पत्रिका बाजूला दिलेली आहे. वाचकांना ती टिचकी मारून मोठी करून बघता येईल.

वरील जंत्रीच अवलोकन संपवल्यानंतर मी त्या बाईंना म्हंटल तुमचा मुलगा कलाकार होणार. व तो कलेच्या माध्यमातूनच करियर करणार. शुक्र व बुधाची पंचमातील उपस्थिती आणखी काय सांगणार.  

माझ  बोलन ऐकून त्यांना  आश्चर्याचा  धक्काच बसला. त्या म्हंटल्या 'अहो काय सांगताय काय ? . याचे पप्पा दोन तीन दिवसांपूर्वीच सांगत होते कि याला संगीताचा क्लास लावून देवू व एक हार्मोनियम सुद्धा घेवून देवू म्हणून. कारण हा सारखा एकटाच दिसेल त्या वस्तूवर हाताने वाजवत असतो,. गाणे गुणगुणतो,  पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अश्याने म्हणून मीच नको म्हंटल.'
'काळजी करू नका. चतुर्थ व नवम भावही कार्येश आहे. तो यथावकाश त्याच शिक्षण पूर्ण करीन. पण त्याला तुम्ही जबरदस्तीने आमुक एकच शिक्षण घे अस करू नका. तो कलाकार आहे त्याच्या मूड प्रमाणे घ्या. 

त्या हसल्या व म्हणाल्या ' आता त्याची पत्रिकाच जर तो संगीतकार, कलाकार  होणार अस सांगतेय तर आता आम्ही त्या दृष्टीकोनातून त्याचा विचार करू...
यालाच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात    कि   काय दिसतात ते वगैरे वगैरे...... 

आपला 
नानासाहेब पाटील
 
 







Monday 21 November 2011

मला नोकरीतून कमी करतील का ?


मित्रानो !

मागे पंधरा वीस दिवसांपूर्वी सुनील पाटीलने त्याचा प्रश्न ई पत्राने पाठवला. तो बंगळूरू स्थित एका आय टी कंपनीत आहे. सध्या तो टेन्शन मध्ये होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या कंपनीची स्थिती अचानक खालावली. अस झाल कि मग गदा येते ती एम्प्लोयीच्या नोकरीवर. बरेचजण त्याच्या कंपनीतून कमी करण्यात आले. त्यालाही त्याच्या  जॉबची खात्री राहिली नव्हती. असो. 

त्याचा प्रश्न होता ' मला नोकरी कधी मिळणार ? कुठे मिळणार ? किंवा मिळणारच नाही ?'. तो फोन करून विचारायचा पण मला त्याची पत्रिका बघायला वेळच मिळायचा नाही. मध्यंतरी त्याच्याकडून के पी सीड घेऊन ठेवला होता. पण हार्ड डिस्कला प्रॉब्लेम  आला.  ती रिपेर झाली यात पाच सहा दिवस गेलेत. एक दिवस तोही येऊन गेला. पण तो दिवाळीचा कालावधी असल्यामुळे निवांत वेळ मिळालाच नाही. त्याचे बेंगलोरहून फोन. 'माझ काय झाल ? कधी सांगणार ?'. 

एक दिवस रात्री १० पर्यंत कार्यालात बसलो. आज कुठल्याही परिस्थितीत सुनीलचा प्रश्न   हातावेगळा करायचाच अस म्हणून इतर सर्व हातातील पत्रिका बाजूला ठेवल्या. कारण त्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत महत्वाचा व गंभीर होत  चालला होता. 

वाचकांसाठी त्याची पत्रिका बाजूलाच दिलेली आहे. टिचकी मारून ती मोठी करून पाहता येईल. 

हि प्रश्न कुंडली आहे. या पत्रिकेनुसार दशमाचा उप नक्षत्र स्वामी गुरु  लग्नात असून नवमेश व व्ययेश आहे. गुरु शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र षष्टात तसेच सप्तमेश व द्वितीयेश   आहे. त्यामुळे सुनीलला कंपनीतून  कमी करण्यात येणार नाही हे नक्की. मी त्याला सांगितलं ' तुला कंपनीतून कमी करणार नाहीत. मात्र गुरु नवमेश असल्यामुळे नोकरीत बदल होणार. तसेच लग्नातील गुरु  नवमेश  असल्यामुळे तू स्वताहून राजीनामा देशील.' हे सगळ सांगितल्यावर त्याने विचारल  किती दिवसात हा बदल होईल ?'. मी पुढील दशा, सुक्ष्मदशा बघितल्यावर त्याला सांगितलं  कि १४/१२/२०११ च्या आत हा बदल होईल.

त्यानंतर  त्याचा फोन आला. म्हंटला ' सर ! तुमची पद्धती अचूक आहे. मी राजीनामा दिलाय व  १०.१२.२०११ ला दुसरी कंपनी जॉईन करतोय.' 


आपला
नानासाहेब पाटील 
 

Tuesday 25 October 2011

अभ्यंग स्नान

नमस्कार मित्रानो !

ब्लॉगच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या !

हि दिवाळी आपण सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची जावो !

अभ्यंग स्नान  

बुधवारी  म्हणजे उद्या पहाटे  ५.१६  नंतर अमावस्या सुरु होत आहे. अभ्यंग स्नान दिवाळीतील महत्वाचे स्नान आहे. जसं सिंहस्थात साधूंच शाही स्नान तसच आपलं नरक चतुर्थीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर केलेल्या अभ्यंग स्नानाला महत्व आहे .

उद्या ब्राह्म मुहूर्त पहाटे ४ वाजेचा आहे. या मुहूर्तावर जर आपण अभ्यंग स्नान केले तर आपण पुण्याचे वाटेकरी व्हाल . पुण्याचा लाभ होईल. 

अभ्यंग स्नान करून पहाटे ५.१६ च्या  आतच, घरातील तसेच जवळच्या मंदिरातील देवांना फराळाचा नैव्यद्य दाखवावा व त्यानंतरच  स्वत: फराळावर ताव  मारावा, तसेच आपले मित्र, स्नेही, आप्तेष्टांना फराळाचे आमंत्रण द्यावे.

आपला शुभेच्छुक 
नानासाहेब पाटील

Monday 24 October 2011

नोकरी बदलली ...

नमस्कार मित्रानो !

एक दिवस शरद आला. बहुतेक सुटीच होती  त्या दिवशी त्याला. जरा घरगुती गप्पा टप्पा झाल्यानंतर त्यान मुख्य विषयाला हात घातला 
म्हंटला 'मला नोकरीत स्थैर्य कधी आहे ते बघ. सध्या जी नोकरी करतोय ती नकोशी झालीय. दुस-या नोकरीचे काही चान्सेस आहेत का तेही सांग.'

म्हंटल ठीक आहे. काढ टोकन. त्याने १७ नंबरच टोकन काढलं. त्याची जन्म तारीख नक्की नसल्यामुळे प्रश्न कुंडली काढावी लागली. ती कुंडली बाजूला दिली आहे. टिचकी मारून ती बघता येईल. 

प्रश्न कुंडली प्रमाणे षष्टाचा उप नक्षत्र स्वामी शनी असून तो चंद्राच्या नक्षत्रात आहे. शनी षष्टात असून दशमेश व लाभेशही आहे. शनी चंद्राच्या माध्यमातून फळे देणार. चंद्र द्वितीयात असून लाभेश आहे.  म्हणजेच नोकरीला मरण नाही.


पत्रिकेला मंगळ महादशा चालू आहे मंगळ २ ८ १ असा आहे व मंगळ बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध ४  ६  ३ लागलाय.  बुध षष्टात असल्यामुळे नोकरीत बदल होणार हे निश्चित. तसेच  पालेभाज्या, लहान आकाराची फळे या माध्यमातून धनार्जन. त्याला हे सांगितलं  तस तो काही बोलला नाही. त्याला म्हंटल ह्या पंधरा दिवसात तुझी नोकरी बदलणार. 

त्यानंतर आठ दहा दिवसांनी त्याचा फोन आला. म्हंटला  'नोकरी बदलली. पिंपळगाव च्या आडतवर नोकरी सुरु केली आहे. 

ब-याच वाचकांना आडत म्हणजे काय हे माहित नसेल. आडत म्हणजे जिथे शेतकरी आपला शेती माल दलाला मार्फत व्यापा-यांना विकतात ती कंपनी. 

शेवटी महत्वाच काय तर टोम्याटो, द्राक्ष, भाजीपाल्याचा व्यापार करणा-या ठिकाणीच शरदला नोकरी लागली. 
धन्यवाद !


आपला 
नानासाहेब पाटील




Monday 3 October 2011

मुलगा कि मुलगी ?

माझा मित्र प्रकाश चौधरी यांचा आपल्या शास्त्रावर चांगलाच विश्वास बसलेला होता. कारण यापूर्वी त्यांना तसा अनुभव येऊन शास्त्राची सत्यता पटली होती. मी त्याला विचारलं ' काय रे काही विशेष ?'  तो म्हंटला 'बायको डिलिवरी साठी माहेरी गेली. काय होईल? काळजी वाटते म्हणून आलो. 

मी विचारलं 'डॉक्टरने कुठली तारीख सांगितली ?' तो म्हंटला  '२२.०९.२०११'
मी लगेच Ruling planet  घेतलं.  

L: शनी 
S: मंगल 
R:  बुध 
D: बुध 

रुलिंग मध्ये शनी आला म्हणून मी त्याला सांगितलं कि २२.०९.२०११ या तारखेला डिलिवरी होणार नाही.उशीर होईल. 

तो म्हंटला मला दिवस सांग. 

मी तो दिवस काढला व त्याला सांगितलं कि २४.०९.२०११ तारखेला  शनिवारी डिलिवरी होईल. नॉर्मल डिलिवरी होणार नाही काळजी घावी लागेल. डिलिवरीच्या वेळेस क्रिटीकल सिचुएशन येऊ शकते. 

तो म्हंटला ' ठीक आहे. आता हे सांगा सर कि मुलगा होईल कि मुलगी ? '

अवघड जागीचं दुखन म्हणतात ते हेच. त्याला म्हटलं कि मुलगा किंवा मुलगी काही झालं तरी काय फरक पडतो. 

तो म्हंटला ' मला काही फरक पडत नाही फक्त उत्सुकता म्हणून विचारतो.'     

मी रुलिंगच्या प्रश्न कुंडलीत  बघितलं पंचमाचा उप नक्षत्रस्वामी मंगळ भाग्यात. 

त्याला म्हटलं 'विष्णू डेअरीत पेढे काय किलो मिळतात.?' 

'का रे ?'

'अरे मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात आपल्याकडे ?'

'काय सांगतोस ? खरच का? '

'झाल्यावर सांग ' मी त्याला तसं सांगितलं.
काय झाल असेल ? वाचकांच्या मनात कदाचित प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही. मीही जास्त न ताणता त्यांची उत्सुकता शमवतो. 

प्रकाशचा मला २५.०९.२०११ ला सकाळी सकाळी फोन आला. 

म्हटला 'तू सांगितलं तसच झाल. २४ तारखेच्या शनिवारीच डिलिवरी झाली. चार टाके पडले. आणि मुलगाच झाला'.

त्याच्या फोनने  मलाही आनंदच झाला. मी मनातल्या मनात माझे मानस गुरुवर्य सोतीधामानन  श्री कृष्णमुर्ती यांना नमस्कार केला व त्यांनी किती  अचूक संशोधन करून ठेवलं  याच नेहमी प्रमाणे आजही विस्मय वाटला.


आपला 
नानासाहेब पाटील





Wednesday 7 September 2011

घटस्फोट मिळाला.... आनंद झाला !

जूलै महिन्याच्या चार तारखेला साधारणता सकाळी तो माझ्याकडे आला. पत्रिका घेऊनच आला होता. म्हणजेच त्याच्या कामाच स्वरूप स्पष्ट होत. तसा त्याच्या प्रश्नाचाही अंदाज मला आला होता. मी त्याला बसता केला.  


म्हंटल 'काय रे ? काही विशेष ?' . म्हणाला "विशेष काही नाही.आपल्या कोर्ट केसेस कधी निकालात निघतील ? ते बघण्यासाठी आलो." 


 तसा तो वैतागलेलाच होता. लग्न झाल्यानंतर त्याची बायको काही महिने नीट वागली. काही महिन्यानंतर त्याचं एकमेकांशी पटेनास झाल. एकदा भांडण विकोपाला गेल. बायको माहेरी निघून गेली तसी परत आलीच नाही. नंतर अनेक प्रयत्न करूनही ते दोघे पुन्हा एकत्र आले नाहीत. 


मग कालांतराने तिने त्याच्यावर पोटगी मिळण्यासाठी दावा दाखल केला. त्याच्यानंतर आणखी हुंडा बळीचा दावा दाखल केला. यात तो तसच त्याच्या घरचे लोकही अडकलेत. एकूण काय तर या सर्व प्रकारात त्या सगळ्यांना खूपच त्रास भोगावा लागला. असो.


 तो म्हंटला या सगळ्यातून कधी सुटका होईल ते बघ.  वाचकांनी हि कुंडली पहावी. कुंडलीवर टिचकी मारून ती पाहता येईल. गुप्ततेमुळे मी त्याच नाव मात्र  पत्रिकेतून काढून टाकल आहे. अर्थात त्याच्याच परवानगीने मी त्याची पत्रिका ब्लॉग वर टाकत आहे. जातकाची परवानगी असले तर आणि तरच मी पत्रिका ब्लॉगवर टाकतो.


जातकाला १०.११.२०१४ पर्यंत रवीची महादशा असून  गुरूची अंतर्दशा १६.०९.२०११ पर्यंत आहे.


महादशास्वामी रवी नवमात व सप्तमेश असून राहूच्या नक्षत्रात आहे. राहू स्वतः सप्तमात व गुरूच्या युतीत. गुरु सप्तमात तसेच लाभेश व द्वितीयेश. गुरु केतूच्या नक्षत्रात. केतू  गुरु, शनी, मंगळाच्या दृष्टीत. शनी सुद्धा सप्तमात.


मंगळ षष्टात अगदी दबंग होऊन बसलेला. तसेच तो दशमातही बलवान झालाय. शिवाय मंगळ बुधाच्या नक्षत्रात. मंगळ बुधाच्या माध्यमातून अष्ठमातही मजबूत लागलेला. 


अंतर्दशास्वामी गुरु वरीलप्रमाणेच कार्येश झाला. थोडक्यात हि जंत्री खालीलप्रमाणे कार्येश झाली आहे.
 गुरु ७  ११  २  शनी ७  १२  १  ९  मंगळ ६  १०  ५  ८  


वरीलप्रमाणे ग्रहांच कार्येश्वत्व बगता. कुठल्याही परिस्थितीत पुनर्मिलन होऊ शकत नाही. पण हिच  महादशा व अंतर्दशा दोन्ही, घटस्फोट मिळण्यासाठी पोषक आहेत. 


पत्रिकेच अवलोकन संपवून मी त्याला सांगितलं कि तुझा सगळा प्रॉब्लेम १६.९.२०११ पर्यंत मिटेल. सर्व कोर्ट केसेस मधून तू मोकळा होशील. अस ऐकल्यावर त्याचा लगेचच विश्वास बसला नाही. कारण तोपर्यंत हा सगळा प्रकार मिटण्याच कुठलही चिन्ह दिसत नव्हत. .....


......आणि कालच या सर्व प्रकारातून तो मुक्त झाला. म्हणजेच १६.९.२०११ च्या आत.




आपला 
नानासाहेब पाटील

Wednesday 3 August 2011

गुण मेलनावरून विवाह करण्याचा प्रकार - भाग 2

सध्याची विवाह जमविण्याची पद्धत ग्रामीण भागातील लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे.  शहरी भागातील लोक मात्र या विषयाकडे चौकस नजरेने पहायला लागलेत. जातकाच्या  जीवनात वैवाहिक सौख जर चांगले असेल तर त्याच प्रकारची वैवाहिक सौख्य उत्तम असलेली कुंडली त्याच्याशी जुळवायला हवी.

ज्या कुंडलीत वैवाहिक जीवन बिघडलेले असेल अश्या जातकाने  ज्योतीर्विदाने सुचविलेले उपाय करून वैवाहिक जीवन सुखकारक कसे होईल हे बघावे. काही जण तात्पुरती सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. पण काही काळानंतर शक्य होत नाही. 

अर्थात ज्याच लग्न ठरत त्याला वैवाहिक जीवन बिघडते म्हणजे काय होत याचा अंदाजच नसतो. ब-याच लोकांना स्वतःबद्धाल नको तेव्हढा आत्मविश्वास असतो. ते बिनधास्त लग्न करतात. आणि ज्यावेळेस वैवाहिक जीवन बिघडते तेंव्हा मात्र त्याच खापर जोडीदाराच्या माथी फोडतात. 

विवाह काळात महादशा स्वामी जर अष्टमाचा बलवान कार्येश असेल तर त्या मुलीने सासर कडील इतर व्यक्ती उदा. सासू, नणंद, दीर वगैरे मंडळींशी जमवून घेतले नाही तर वैवाहिक जीवन बिघडून जाते. पती-पत्नीचे एकमेकावर प्रेम असते पण पतीच्या घरच्या लोकांमुळे वैवाहिक जीवन उपभोगता येत नाही. अनेक मुली याच कारणामुळे पतीपासून दूर राहतात व शेवट घटस्फोट घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. 

एखाद्या मुलाच्या पत्रिकेत चतुर्थेश जर बलवान असेल तर असा मुलगा मातृभक्त असतो. म्हणजे जरा अतीच असतो. तो बायकोच काहीएक ऐकून घेत नाही. तिची चूक असो नसो तो तिला झापनारच. दोष त्याचा नसतो. 

अशा वेळेस आपले वैवाहिक जीवन कसे असेल हे जर अगोदरच  माहित झाले तर त्याप्रमाणे मानसिक, शारीरिक तयारी करता येते व एकमेकांचे दोष न बघता वैवाहिक जीवन जास्तीतजास्त सुखकारक कसे राहील यासाठी प्रयत्न करता येतात.


वैवाहिक जीवनात लैंगिक सौख्य हा विषय खूप महत्वाचा आहे. जातकाच्या पत्रिकेवरून त्याची लैंगिक सुख उपभोगण्याची पद्धती व क्षमता याचा अंदाज बांधता येतो.


या भावावर जर रविग्रह, सिंह राशीचा प्रभाव असेल तर अशी व्यक्ती विषय सुख उपभोगताना आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर राखते. सामान्य नैसर्गिक पद्धतीने सुख देते व घेते.

मंगळ  ग्रहाचा संबंध जर प्रभावी असेल तर असे लोक फार रांगडे असतात. त्यांना नेहमी घाई असते. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा ते फारसा विचार करत नाही. शरीरसुख उपभोगताना विचित्र पद्धतीचा अवलंब करतात. नैसर्गिक सुखाबरोबरच अनैसर्गिक पद्धतीने सुख ओरबाडण्याची मानसिकता असते. जोडीदाराला शारीरिक वेदना देण्यात त्यांना आनंद वाटतो.
 
बुध ग्रहाचा परिणाम अधिक असेल तर असे लोक उन्मादकता कमी व  बालिश चाळेच जास्त करतात. जर बुध कन्येत असेल तर  जोडीदाराला नेहमीच अतृप्त ठेवतात.


चंद्राचा किंवा जलतत्वाच्या राशीचा संबंध अधिक प्रभावी असेल तर असे लोक विषयसुखात अत्यंत भावनाशील असतात. संभोगावस्थेत याचं मन अनेक विचारात गुंतलेले असते. कधी कधी अपूर्णावस्थेत संभोग क्रिया सोडून देतात. अशावेळेस हे लोक उन्मादक प्रेमाऐवजी सात्विक प्रेमाची उधळण करतात.

असा सर्वांगीण विचार करूनच पत्रिका जुळवायला हव्यात. 

शुभं भवतु !

नानासाहेब पाटील

Wednesday 20 July 2011

गुण मेलनावरून विवाह करण्याचा प्रकार बकवास आहे - भाग १

ज्योतिष शास्त्रात 'गुण मेलन' करून विवाह करण्याचा प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. नाडी, राशी, योनी व गुण यांपैकी कोणतेही तीन भाग जुळले कि कुंडली जुळते.

नाडी ८, योनी ४, गण ६ राशी ७ असे गुणांचं वाटप केल  जात

नाडी ८ + योनी ४  + गण ६ = १८ गुण
नाडी ८ + योनी ४ + राशी ७ = १९ गुण
गण ६ + नाडी ८ + राशी ७ = २१ गुण

याचाच अर्थ वरील चार मुख्य भागांपैकी कोणतेही तीन भाग जुळले कि कुंडली जुळते. कारण कमीत कमी १८ गुण मिळताच वर्ण, वश्य, तारा, ग्रहमैत्री, यातून २-४ गुण मिळतातच.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नक्षत्र व राशीचा आधार गुण मेलनासाठी घेतला जातो त्या नक्षत्र राशींचे सर्व गुणधर्म जातकाच्या अंगी असतात का? देव गणाचा जातक खरोखरच देवासारखा सत्वगुणी असतो का ? निदान वैवाहिक जोडीदाराशी तरी सत्वगुणी धर्म पाळतो का ?  अनेक देव गणांच्या जातकांचे विवाहबाह्य संबंध दिसून येतात.  अस का ? राक्षसगणी खरोखरच राक्षसी प्रवृतीचा असतो का ?

एकाच नक्षत्र राशीतच नव्हे तर एकाच नवमांशात जन्माला आलेल्या दोन भिन्न व्यक्तीचे गुणधर्म जर वेगवेगळे दिसून येतात तर त्याच आधारे केलेले गुण मेलन हे विवाह जुळविण्यासाठी निश्चितच कुचकामी आहे.

याकरिता वधूवरांच्या दोन्ही कुंडल्यांचा संपूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्यायला हवा. काही कुडमुड्या ज्योतिषांना पंचांगा पलीकडे ज्ञान नसते पण तेही ३२ गुण जुळतात म्हणून छातीला माती लावून सांगतात 'बिनधास्त लग्न करा ! काही अडचण नाही ' .

खर तर वर किंवा वधू  दोघांनी कुंडली जुळवताना विचार करायला हवा. हि कुंडली माझ्याशी जुळते का ? म्हणजे या व्यक्तीचा स्वभाव माझ्याशी जुळेल का ? थोडक्यात वेव्ह लेंग्थ जुळेल का ? मला मानसिक, शारीरिक समाधान देईल का ? नोकरी करील का ? वगैरे वगैरे .

या सर्वांची उत्तरे १० सेकंदात केल्या जाणा-या गुण मेलनातून देता येऊ शकत नाही.

कुंडलीतून जातकाचे वैवाहिक जीवन कसे राहील हे कळते. त्याच अर्थार्जन, त्याचे नसते उद्योग, त्याची प्रवृत्ती वगैरे सगळ्या गोष्टी कळतात.

समजा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत वैवाहिक जीवन उपभोगण्याची क्षमता नसेल तर ?

उदा. समजा एखादा पुरुष नपुंसक असेल त्याला वैषयिक सुख उपभोगण्याची क्षमताच नसेल आणि त्याचा विवाह रंभा, उर्वशी, मेनकेशी जुळवून  दिला तरी त्याला किंवा तिला त्याचा काय उपयोग?

एखाद्या स्त्रीला मुलच होणार नसेल तर पुरुषाच्या पौरुषत्वाचा तिथे काय उपयोग ?   

एकाच लेखात हा विषय संपत नाही म्हणून हा विषय पुढील भागात घेणार आहे. .....



शुभंभवन्तु !

आपला
नानासाहेब पाटील
 

Thursday 7 July 2011

अनेक व्यवसाय करूनही अपेक्षित यश नाही...

काल माझा एक जुना मित्र मला भेटायला आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर म्हंटला माझ नोकरी व्यवसायाच  बघ  जरा. सध्या म्हणाव तस अर्थार्जन नाही. मी त्याची कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका मांडली व पुढील येणारा काल त्याच्यासाठी कसा असेल ते बघितले. वर दिलेली पत्रिका त्याची आहे. टिचकी मारताच मोठी करून बघता येईल. नाव गोपनीय ठेवले आहे. उगाच त्याला अडचण नको.

जातक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत आहे, त्याच्या म्हणण्यानुसार अनेक व्यवसायही केलेत. पण अपेक्षित यश मिळाले नाही. व्यवसायात अपयशच आल व नोकरीतही म्हणाव तसा उत्कर्ष किंवा प्रगती झाली नाही. अनेक उपायही करून बघितलेत पण परिस्थिती जैसी थे !

पत्रिका जरा वेगळी आहे म्हणून ज्योतिष वाचकांना व अभ्यासकांना तीच विवेचन करता याव तसेच वाईटातून चांगले आउटपूट कसे काढता येते ते कळावे म्हणून हि पत्रिका महत्वाची वाटली.

जातकाला सध्या राहूची महादशा आहे व ती २०२१ पर्यंत आहे.  राहू तृतीयात असून शुक्राच्या दृष्टीत आहे. शुक्र नवमात तसेच व्ययेश व सप्तमेश आहे.

नवम भाव नोकरी व्यवसायात अत्यंत त्रासदायक ठरतो. त्याच कारण म्हणजे जातकाची सतत बदल करण्याची वृत्ती. कोणतेही कारण नसताना नोकरी बदलणे, तसेच व्यवसाय बदलणे, या दोन प्रवृत्तींमुळे सातत्य रहात नाही. दुसरे असे कि या लोकांना सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

नवम भावामुळे देवदर्शन, अनेक धार्मिक स्थळांना भेटी देणे असे प्रकार वाढतात,  इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, म्हणजेच प्रसंग आलाच तर कासेची लंगोटी सोडून देतील. समाज कार्यात, धार्मिक कार्यात सतत भाग घेणे.  म्हणजे काम धंदा सोडून लष्कराच्या भाकरी भाजणे. या सर्व बाबींचा नोकरी व्यवसायावर सतत विरोधात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे नोकरी व्यवसायात स्थिरता लाभात नाही.

वरील भावामुळे नोकरीला प्रोब्लेम आलाच तसेच व्यवसायातही अपयश आल. पण त्याने निवडलेले व्यवसाय त्याच्या पत्रिकेला अनुसरून नसल्यामुळे अडचणी आल्या. मी त्याला कुठला व्यवसाय करावयाचा ते सांगितले. तसेच राहूचा तोडगा व दैवी उपायही सांगितला.

त्याला सांगितले कि आता जोही व्यवसाय करशील तो रिटेल स्वरूपाचाच असला पाहिजे. घाऊक व्यापारात वाट लागेल. व्यवसाय स्वतंत्र न करता भागीदारीत करावा. सगळ्यात महत्वाची अट म्हणजे भागीदारी एखाद्या स्री बरोबर करावी.

हि अट ऐकून तो उडालाच ! तो म्हंटला हे कस शक्य आहे ?

मी म्हंटल का नाही ? बायको, बहिण, आई अस आपल्याच घरातील कुठल्याही स्री बरोबर भागीदारी कर. बाहेर नको.

शुक्र सप्तमेश असल्यामुळे स्री बरोबर केलेली भागीदारी उत्तम प्रतीची ठरते. रोखीच्या व्यवहारात चांगलाच फायदा होतो. घाऊक व्यापार टाळावा.

शुक्र व्ययेश असल्यामुळे खर्चिक वृत्ती वाढणार यात शंकाच नाही पण त्याच शुक्रामुळे कर्जफेडहि होणार.      
 
त्याला आणखी एक महत्वाची सूचना केली कि २०५६ पर्यंत व्यवसायात बदल करू नको.

शुभंभवन्तु  !

आपला
नानासाहेब पाटील

Monday 27 June 2011

अल्प वैवाहिक सौख्य

                                                                ||        श्री         ||

काल माझे एक मित्र वरील पत्रिका घेऊन आले. मला म्हणाले 'हि पत्रिका माझ्या एका नातेवाईक मुलीची आहे. तीच तिच्या नव-याशी पटत नाही. काय अडचण आहे बघा जरा ? त्यांनी दिलेली पत्रिका सोबत जोडली आहे. खाजगी कारणास्तव पत्रिकेत नाव घातल नाही. 

मी पत्रिकेच्या दशा अंतर्दशा बगीतल्या. तिला मंगळाची  दशा व शनीची अंतर्दशा चालू आहे. पत्रिकेतील दशा वगैरे पाहून मी खालील जंत्री मांडली.  हि कुंडली अभ्यासकांनी जरूर बघावी.

मंगळाची महादशा ०४-०४-२००८  ते ०४-०४-२०१५
महादशा स्वामी मंगळ : ८ ९ १ १० २ ७
अंतर्दशा स्वामी शनी : ६ १० ९ ४ ५

 पत्रिकेत महादशास्वामी मंगळ १० २ ७ असून तो शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र ९ १ लागलाय. तो पत्रिकेतील ८ ९ १ भावांचा बलवान कार्येश आहे.  अंतर्दशास्वामी शनी ९ ४ ५ असून तो चंद्राच्या नक्षत्रात. चंद्र ६ १० आहे. सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी बुध आहे व तो ८  ९  १  ३  १२ ७ या भावांचा बलवान कार्येश आहे.

वरील जंत्री बगता घटस्फोट अटळ आहे हे लक्षात येईल. सर्व कार्येश ग्रह कुटुंबस्थान, विवाह्स्थान व लाभस्थानाच्या विरोधात बलवान आहेत. 

अशा जातकाला  मारहाण, मानसिक त्रास, छळ वगैरे सारख्या त्रास भोगावा लागणारच. 

पण हि सध्या स्थिती आहे. कदाचित पुढची महादशा वेगळ काही घडून आणू शकते म्हणून मी पुढील येणारी महादशा बघितली. ती दशा राहूची. ती ०४-०४-२०१५ ते ०४-०४-२०३३ पर्यंत आहे.  

राहू व्ययात असून त्यावर चंद्राची दृष्टी आहे व त्याचा नक्षत्रस्वामी शुक्र आहे. म्हणजे राहू हा ६  १०  १२  ८  ९  १ असा लागलाय. एकही कार्येश ग्रह वैवाहिक सुखासाठी कारक नाही. म्हणजे २०३३ पर्यंत हे असच चालणार.


अशात पुनर्मिलन वगैरे प्रकार शक्यच नाही किंवा पुढे कधीतरी या जाचातून सुटका होईल अशी आशाहि नाही. त्यामुळे मी सांगितले कि घटस्फोट घेण्याच्या प्रोसेसला लागा. घटस्फोट तत्काळ मिळण्याची परिस्थिती आहे.

त्यांनी सांगितले कि तुम्ही सांगता ते अगदी खर आहे. घटस्फोट घेण्याच्या तयारीला आम्ही लागलो होतो. पण गेल्या महिन्यातच तिच्या नव-याचा मृत्यू झाला. हे एकूण धक्काच बसला. कारण हे त्यांनी अनपेक्षित सांगितले.  मी त्यांना विचारले कि तुम्ही मला हे आधी का नाही सांगितले? ते म्हंटले कि 'नशीब'  हा प्रकार खरच असतो का हे बघायचे होते ? त्यामुळे काय घडल ते सांगितले नाही. पण तुम्ही जे सांगितले ते अगदी शंभर टक्के बरोबर आहे. अन नशीब हा प्रकार खरच असेल तर तिच्या नशिबात पुढे काय आहे हेही विचारायचं होत ?

मी त्यांना सांगितले कि एकंदरीत या जातकाच्या नशिबात वैवाहिक सौख्य अगदीच अल्प आहे. पुनर्विवाह करूनही परिस्थिती साथ देणार नाही २०३३ पर्यंत हे असच चालणार. तोपर्यंत तीच वय पन्नाशीच्या आसपास जाईल. 

नशीब शेवटी !  काय ..  अस म्हणून ते उठले. 

ते गेले पण मी मात्र विचारातून बाहेर पडलो नव्हतो. आपण घटस्फोट या विषयावरच लक्ष्य केंद्रित केल्यामुळे हि घटना लक्ष्यात आली नाही का ? पुन्हा एकदा मी पत्रिकेत डोक खुपसून बसलो. बगता .. बगता..  बगता .. क्षणार्धात क्लिक झाल. आयची S  रे  S   S   या  S   मंगळाच्या.

पत्रिकेत मंगळ सप्तमेश आहे, मंगळाचीच दशा चालू  व तो शुक्राच्या माध्यमातून अष्टमाचाही बलवान कार्येश झालाय. सप्तमेश मंगळ अष्टमात. वैधव्य योग.

मी माझ्या मागच्या लेखात  'मंगळाचाच दोष का मानतात ?'  यामध्ये सप्तमेश मंगळ जर अष्टमात असेल तर वैधव्य योग येतोच हे लिहिले आहे.  

आपला 
नानासाहेब  पाटील

Thursday 23 June 2011

मी कुठले रत्न धारण करू ?

कुठले रत्न धारण करावे याबद्दल ब-याचदा संभ्रम निर्माण होतो. काही वेळा नको ते रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो अन ते अंगाशी येत. 

समजा चंद्र दशमात  आहे व चंद्राच्या मालकीची कर्क रास तृतिय भावारंभी आहे. गुरु पंचमात असून अष्टमेश व लाभेश आहे.  चंद्र दशमात म्हणजे नोकरीचा सुकाळ. अनेक नोक-या मिळतात, मानसन्मान, सामाजिक जीवनात यश मिळते, धंदा व्यवसायात उर्जितावस्था येते. 

एखाद्याच चांगभल असेल तर तो ज्योतिष्याकडे जाणार नाही. पत्रिकेत चंद्र दशमात असूनही  तो ज्योतिषाकडे येतो व नोकरी गेल्याच किंवा व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याच सांगतो. 

चंद्र दशमात असूनही नोकरी जाते, नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात अडचणी निर्माण व्हायला लागतात का होत अस ?  वर सांगितल्या प्रमाणे चंद्र जरी दशमात असला तरी तो गुरूच्या मालकीच्या नक्षत्रात आहे व गुरु पंचमात असून तो अष्टमेश व लाभेश आहे म्हणजेच ५,८,११ आहे व चंद्र १०, ३ आहे. म्हणजेच चंद्र ज्या भावस्थानाचा कार्येश आहे त्याच्या ऐवजी गुरु ज्या भावस्थानाचा कार्येश आहे त्याचीच  फळे मिळतील व त्यानंतर जमल्यास चंद्र ज्याठिकाणी आहे त्याची फळे मिळतील.     

गुरु पंचमात म्हणून तो षष्टाच्या व्यय स्थानाचा  बलवान कार्येश झाला अशा अवस्थेत नोकरी जाणारच, नोकरी मिळणारच नाही किंवा धंदयाची पार वाट लागेल.

मग अशा जातकाला कुठले रत्न धारण करावे लागेल कळले का ?  पुष्कराज ? कारण धंदयात बरकत म्हंटल कि बरेच व्यावसायिक पुष्कराज धारण करताना दिसतात. पण  जर या जातकाने  पुष्कराज रत्न धारण केले तर धंदयात ऊर्जितावस्थेऐवजी मोठा तोटा होऊन दिवाळखोरीच दिसेल.

रत्न धारण करूनही त्याला रिझल्ट्स मिळत नाही व जातकाचा मात्र जोतिष शास्त्रावरचा विश्वास उडून जातो.

मग अशावेळेस चंद्रबल वाढवण्याकरिता मोती रत्न धारण करण्याचा सल्ला त्याला दिला जातो व तेच योग्य आहे. 

कुठलेही रत्न धारण करताना एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा सहा, आठ,  बारा  या स्थानांचे रत्न कधीच धारण करू नये.

कारण सहावे रोग स्थान आहे, आठवे मृत्यू स्थान आहे व बारावे व्यय स्थान आहे. या स्थानांचे ग्रह नकारात्मक भूमिका निभावत असतात. यास्थानांची रत्ने वापरणे म्हणजे शत्रूची ताकद वाढवण्यासारख होईल.  

लग्नात मंगळ असलेल्या व्यक्तीने जर पोवळे वापरले तर तो स्वतःच भांडणे करीन व सांगेन सध्या माझ  कुणाशीच पटत नाही. कस पटणार मेषेचा मंगळ म्हणजे अग्नी. पोवळे धारण करून आगीत तूप ओतल्यासारखच  होईल.

शुक्र कलेशी  निगडीत आहे कलेचा कारक आहे. एखादयाचा कलेशी संबंधित व्यवसाय असेल तर अश्या व्यक्तीला हमखास शुक्राचे रत्न  हिरा वापरायला सांगतात. ब-याच बायकांना हि-याचे दागिने वापरण्याची हौस असते. 

समजा जातक जर स्त्री असेल व शुक्र चतुर्थात असेल तर ती  अविवाहित आहे तोपर्यंतच त्या जातकाने हिरा धारण केला तर लाभदायक ठरेल. लग्न झाल्यानंतर मात्र ते रत्न वापरू नये. कारण शुक्र चतुर्थेश असल्यामुळे पंचमाचा व्ययेश आहे व तो संतती होण्यास अडथळे निर्माण करणारच. 

मग पुन्हा ज्योतिष्याकडे ! संतती होत नाही म्हणून !

आपला 
नानासाहेब पाटील

Monday 20 June 2011

राहू - केतूची महादशा

कृष्णामुर्तिनी सांगितले आहेच कि  छायाग्रह हे दृश्य ग्रहांपेक्षा बलवान असतात. ज्या कुंडलीस राहू किंवा केतूची महादशा असते किंवा दशा स्वामी राहू किंवा केतूच्या नक्षत्रात असतो. अशा लोकांचे प्रश्न देखील विचित्र असतात.

योग्य प्रकृती असूनसुद्धा संतती होत नाही.
मुलांच्यात काही विचित्र दोष असणे
संततीचा अचानक मृत्यू, घरात नेहमीच भांडणे होणे
व्यक्ती घरातून पळून जाणे
स्रियांच्या बाबतीत तारुण्यातच मासिक पाळी बंद होणे
सतत गर्भपात होणे
घरातल्या सर्वच व्यक्तींना विक्षित चिंता असणे उदा. नोकरी न लागणे, व्यवसायात तोटा होणे, विवाह न होणे किंवा मुल न होणे
कानात गुं गुं आवाज होत असल्याचा भास होणे
वेड लागणे
नेहमी झोपावसे वाटणे
आळसाने कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे
अंगात पैशाचिक संचार होणे इ. 

यासारखे अनेक प्रश्न येतात. जे सर्व साधारण व्यावहारिक प्रश्नांच्या पलीकडचे आहेत. 
राहू केतूच्या अधिपत्याखाली कुंडली असताना अनेक लोक डॉक्टरी उपचार करून थकलेले असतात. म्हणून त्यांना व्यवहारिक किंवा वैद्यकीय उपचारांच्या पलीकडील उपायांची गरज असते.
अशा जातकांना भयंकर मानसिक अवस्थेतून जावे लागले नाही तर नवलच !

आपला 
नानासाहेब पाटील 


Sunday 19 June 2011

नव ग्रहांपैकी फक्त मंगळ ग्रहाचाच दोष का असतो ?

नव ग्रहांपैकी फक्त मंगळ ग्रहाचाच दोष का असतो ? इतर ग्रहांचा दोष का मानत   नाहीत ? कारण मंगळ हा पाप ग्रह आहे, अविचारी आहे,  अग्नी प्रकृती आहे, जलद गतीने परिणाम करणारा आहे. वैवाहिक सुखात बाधा निर्माण करतो.  

हा मंगळ जर १ ४ ७ ८ १२ पैकी असेल तर मंगळ दोष मानला जातो किंवा मंगळाची पत्रिका समजली जाते.  

शनी सुद्धा पाप ग्रह आहे पण तो अकस्मात हानी करीत नाही. तो नियोजनबद्ध वाट लावतो.

या पाचच भावात मंगळ दोष का? सौम्य व कडक मंगळ केंव्हा समजावे ? 

ज्या भावात मंगळ असतो त्यापेक्षाही जास्त परिणाम तो दृष्टी असलेल्या ठिकाणी करतो. 

जर मंगळ 1st house मध्ये असेल किंवा लग्नात असेल तर त्याची दृष्टी सप्तमावर म्हणजे विवाह स्थानावर असते. जातकाचा स्वभाव तापट असतो. त्याची चौथी दृष्टी चतुर्थ स्थानावर असते. या भावावरूनच सर्व सुखे बघितले जातात. सुखाची हानी करतोच व वैवाहिक सुखाचीही हानी करतो. स्रियांना वैवाहिक सुखाचा कारक मंगळ आहे. त्यामुळे त्यांना तो जास्तच त्रासदायक ठरतो. पुरुषांपेक्षाही स्रियांना मंगळ दोष जास्त त्रास देतो. 

पुरुषाच्या कुंडलीत मंगळ जर सप्तमात असेल तर पत्नी कर्कश, तापट, कैदासीन मिळते. म्हणजेच सप्तमात मंगळ असेल तर वैवाहिक जोडीदाराचा स्वभाव तापट असतो. 

अष्टमात मंगळ असेल तर आकस्मित मृत्यू , पूर्ण आयुष्य नाही, घातपात, अपघात, घर सोडून जाणे, दूरदूर रहाणे असे भोग वाट्याला येतात. एकंदरीत काय तर वैवाहिक सुख मिळत नाही. 

व्यय स्थानात जर मंगळ असेल तर मंगळाची आठवी दृष्टी सप्तमावर असते. व्ययात मंगळ म्हणजे अशुभ. हे शैयासुखाचे स्थान आहे. अनेक अपप्रकार निर्माण होतात. शैयासुख नष्ट होते. लग्नबाह्य संबंध स्थापित होतात. म्हणून मंगळ दोष मानला जातो. 
       
जर मंगळ १ ८ १० ४ ३ ६ या राशीचा असेल तर सौम्य असतो. मेष व वृश्चिक या स्वराशी आहेत. उच्च राशी मकर असेल तर मंगळ दोष नाही . मंगळ जर शत्रूराशीत असेल म्हणजे ३ ६ असेल तर मंगळ दोष नाही. जर मंगळ निचीचा असेल तर बलहीन असतो. उदा. कर्क राशी. मंगळ दोष नाही. मंगळ जर रविजवळ असेल किंवा एकाच अंशात्मक युतीत असेल तर सौम्य मंगळ. याचाच अर्थ मंगळ दोष नाही.

आयुष्यात २०-५० हे वैवाहिक सुखाचे वर्ष समजले जातात. या दरम्यानच जर मंगळाची दशा  येत असेल तर मंगळ दोष समजावा. दशा भयंकर परिणाम करते. जातकची अक्षरश: दशा दशा होते.

सप्तमेश मंगळ अष्टमात किंवा अष्टमेश मंगळ सप्तमात असेल तर महादोष. स्रीजातक असेल भयंकर दोष. वैधव्य येण्याची दाट  शक्यता. 

मंगळाच्या पत्रिकेत जर गुरु ६ ८ १२ असेल तर गुरूच बल मिळणार नाही. वैवाहिक आयुष्याची धूळदान होते.

आपला
नानासाहेब पाटील