Monday 27 June 2011

अल्प वैवाहिक सौख्य

                                                                ||        श्री         ||

काल माझे एक मित्र वरील पत्रिका घेऊन आले. मला म्हणाले 'हि पत्रिका माझ्या एका नातेवाईक मुलीची आहे. तीच तिच्या नव-याशी पटत नाही. काय अडचण आहे बघा जरा ? त्यांनी दिलेली पत्रिका सोबत जोडली आहे. खाजगी कारणास्तव पत्रिकेत नाव घातल नाही. 

मी पत्रिकेच्या दशा अंतर्दशा बगीतल्या. तिला मंगळाची  दशा व शनीची अंतर्दशा चालू आहे. पत्रिकेतील दशा वगैरे पाहून मी खालील जंत्री मांडली.  हि कुंडली अभ्यासकांनी जरूर बघावी.

मंगळाची महादशा ०४-०४-२००८  ते ०४-०४-२०१५
महादशा स्वामी मंगळ : ८ ९ १ १० २ ७
अंतर्दशा स्वामी शनी : ६ १० ९ ४ ५

 पत्रिकेत महादशास्वामी मंगळ १० २ ७ असून तो शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र ९ १ लागलाय. तो पत्रिकेतील ८ ९ १ भावांचा बलवान कार्येश आहे.  अंतर्दशास्वामी शनी ९ ४ ५ असून तो चंद्राच्या नक्षत्रात. चंद्र ६ १० आहे. सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी बुध आहे व तो ८  ९  १  ३  १२ ७ या भावांचा बलवान कार्येश आहे.

वरील जंत्री बगता घटस्फोट अटळ आहे हे लक्षात येईल. सर्व कार्येश ग्रह कुटुंबस्थान, विवाह्स्थान व लाभस्थानाच्या विरोधात बलवान आहेत. 

अशा जातकाला  मारहाण, मानसिक त्रास, छळ वगैरे सारख्या त्रास भोगावा लागणारच. 

पण हि सध्या स्थिती आहे. कदाचित पुढची महादशा वेगळ काही घडून आणू शकते म्हणून मी पुढील येणारी महादशा बघितली. ती दशा राहूची. ती ०४-०४-२०१५ ते ०४-०४-२०३३ पर्यंत आहे.  

राहू व्ययात असून त्यावर चंद्राची दृष्टी आहे व त्याचा नक्षत्रस्वामी शुक्र आहे. म्हणजे राहू हा ६  १०  १२  ८  ९  १ असा लागलाय. एकही कार्येश ग्रह वैवाहिक सुखासाठी कारक नाही. म्हणजे २०३३ पर्यंत हे असच चालणार.


अशात पुनर्मिलन वगैरे प्रकार शक्यच नाही किंवा पुढे कधीतरी या जाचातून सुटका होईल अशी आशाहि नाही. त्यामुळे मी सांगितले कि घटस्फोट घेण्याच्या प्रोसेसला लागा. घटस्फोट तत्काळ मिळण्याची परिस्थिती आहे.

त्यांनी सांगितले कि तुम्ही सांगता ते अगदी खर आहे. घटस्फोट घेण्याच्या तयारीला आम्ही लागलो होतो. पण गेल्या महिन्यातच तिच्या नव-याचा मृत्यू झाला. हे एकूण धक्काच बसला. कारण हे त्यांनी अनपेक्षित सांगितले.  मी त्यांना विचारले कि तुम्ही मला हे आधी का नाही सांगितले? ते म्हंटले कि 'नशीब'  हा प्रकार खरच असतो का हे बघायचे होते ? त्यामुळे काय घडल ते सांगितले नाही. पण तुम्ही जे सांगितले ते अगदी शंभर टक्के बरोबर आहे. अन नशीब हा प्रकार खरच असेल तर तिच्या नशिबात पुढे काय आहे हेही विचारायचं होत ?

मी त्यांना सांगितले कि एकंदरीत या जातकाच्या नशिबात वैवाहिक सौख्य अगदीच अल्प आहे. पुनर्विवाह करूनही परिस्थिती साथ देणार नाही २०३३ पर्यंत हे असच चालणार. तोपर्यंत तीच वय पन्नाशीच्या आसपास जाईल. 

नशीब शेवटी !  काय ..  अस म्हणून ते उठले. 

ते गेले पण मी मात्र विचारातून बाहेर पडलो नव्हतो. आपण घटस्फोट या विषयावरच लक्ष्य केंद्रित केल्यामुळे हि घटना लक्ष्यात आली नाही का ? पुन्हा एकदा मी पत्रिकेत डोक खुपसून बसलो. बगता .. बगता..  बगता .. क्षणार्धात क्लिक झाल. आयची S  रे  S   S   या  S   मंगळाच्या.

पत्रिकेत मंगळ सप्तमेश आहे, मंगळाचीच दशा चालू  व तो शुक्राच्या माध्यमातून अष्टमाचाही बलवान कार्येश झालाय. सप्तमेश मंगळ अष्टमात. वैधव्य योग.

मी माझ्या मागच्या लेखात  'मंगळाचाच दोष का मानतात ?'  यामध्ये सप्तमेश मंगळ जर अष्टमात असेल तर वैधव्य योग येतोच हे लिहिले आहे.  

आपला 
नानासाहेब  पाटील

No comments: