Saturday 21 July 2012

कर्माची निवड .......

आयुष्याच्या वाटेवरील अत्यंत महत्वाच वळण म्हणजे आयुष्यभर  आपण काय कर्म करणार ते ठरण किंवा ठरविणे. काहींच हे आपोआप ठरत तर  काहीना ठरावाव लागत. एकदा दिशा निश्चित झाली कि फक्त चालायचं. पण काही लोक असे असतात ज्याचं आयुष्य फक्त काय करायचं हे  ठरविण्यातच  जात. 

कुंडलीतील दशम भाव जातकाच कर्म निश्चित करतो. शनीचा दशम भावाशी कुठल्याना कुठल्या स्वरुपात जर संबंध येत असेल तर साधारणपणे ३५ -४० नंतरच स्थिरत्व येत. तो पर्यंत अनेक नोक-या व्यवसाय बदलतात. शनी परीक्षा घेतो, कसोटीच म्हणाना पण नंतर शनी अगदी भरभरून देतो. पण मधला जो काळ जातो त्या काळात मनुष्य तावून सुलाखून निघतो.  त्यामुळेच  नंतर येणा-या सुवर्णकाळाचा उपभोग त्याला घेता येतो. नाहीतर भरभराट असली कि अनेक लोक उधळ मानके पणा करतात. मी पणा वाढून जातो. बरीच मंडळी सुसह्य जगन असह्य करून घेतात, स्वत:चही करतात व आपल्या आप्तस्वकीयांचही  करतात. 

काल केशवराव आले. त्यांची कुंडली माझ्याकडे संघनकावर  आहेच.  यावेळेस प्रश्न जरा वेगळा होता. त्यांच्या नोकरी व्यवसायाबद्दल चर्चा करण्यासाठी ते आले होते. 

केशवरावचा   प्रश्न होता नोकरी व्यवसायात  स्थिरत्व कधी येणार ? व्यवसाय कुठला करावा ? वगैरे.  

त्यांची पत्रिका बाजूला दिलेली आहे. आपण त्यावर टीचकी मारून ती मोठी करून पाहू शकता. 

सध्या गुरूची महादशा सुरु असून ती २०१४ पर्यंत कार्येश आहे. गुरु ५  ११ चा कार्येश असून तो राहूच्या उप नक्षत्रात आहे. राहू द्वितीयात आहे. राहू मंगळाच्या दृष्टीत, मंगळ ८  ९  १०  २ तसेच तो चंद्राच्या उप नक्षत्रात , चंद्र लाभात तसेच तो षष्ठाचाही  बलवान कार्येश आहे. राहू शुक्राच्या नक्षत्रात, शुक्र २  ३  ४  ८.

वरील जंत्रीचा विशेष अभ्यास करावा लागला. कारण पुढील येणारी महादशा शनीची आहे. शनी १  १२ चा कार्येश असून तो रवीच्या नक्षत्रात आहे. रवी १  ७ चा कार्येश. 

पत्रिकेतील गुरु, मंगळ, राहू, केतू हे  चंद्राच्या  माध्यमातून  षष्ठाचेच    मजबूत कार्येश होतात,  त्यामुळे त्याचाच व्यवसाय निवडला. शेती, दुग्ध व्यवसाय, रविमुळे पेस्टी सायीड या व्यवसायांमध्ये त्यांना उत्तम यश राहील. 

अस  सांगितल्यावर त्यांनी त्यांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. 

" शेतीत आजवर आपल्याला नुकसान झालेलं नाही. तसेच शेतात ज्या ज्या भागात मी फिरतो त्या त्या भागातील पिक भरघोस  येत. ज्या भागात मी फिरत नाही तिकडे खास रिझल्ट मिळत नाही." अनुभव सांगताना केशवराव  भूतकाळात  गेले.

"तसेच एकदा मी शेतात बोर मारलं. पाणी कुठे लागेल हे दाखवणारा  पानाड्या हि आणला होता. पण बोर फेल  गेल. नंतर मीच शेतात एक चक्कर मारला व बोर मारणा-याला मी स्वत:च जागा दाखवली. त्या जागेवर असा पाय ठेवला व बोर मारणा-याला  सांगितलं,  मार बोर. त्यान बोर मारताच काय आश्चर्य ? चांगल पाणी लागल . त्यावेळी मला विशेष वाटलं होत. पण आता लक्षात येतंय अस का झाल ते. " केशवराव रंगात  येवून सांगत होते. 

"अहो S  S चंद्र हा जल तत्वाचा कारक असल्यामुळे तुम्हाला हे शक्य झाल." मी  चंद्राच कारकत्व त्यांना समजावून सांगितलं. 

"आता लक्षात येतंय." त्यांनी हसून मान  हलवली. 

"याच व्यवसायात लक्ष घातल   तर धनार्जन उत्तम असेल काळजी करायच कारण नाही,   षष्टातील चंद्रा मुळे तुम्हाला सर्दीचाही त्रास जाणवेल. काही लोकांना हि सर्दी बारमाही सर्दी असते."  मी त्यांना चंद्रामुळे काय विकार होवू शकतो ते सांगितले. 

"आहे,   मला सर्दीचा त्रास अगदी पहिल्या पासून आहे. याचा संबंध कुंडलीतील ग्रहांशी येतो हे मला आजच कळतंय. " त्यांनी दुजोरा  दिला 

"म्हणूनंच तुम्ही आता दुस-या कुठल्याही व्यवसायात लक्ष घालू नका. यातच उत्तम यश मिळेल. उगाच हे करू का ते, एक ना धड भाराभर चिंध्या काय कामाच्या " मी स्पष्ट काय ते सांगितलं. 

"नाही आता स्वानुभवाने लक्षात आलय. डोक्यातला गोंधळ संपला. आता पूर्ण लक्ष मी शेती आणि दुग्ध व्यवसायात घालतो." केशवराव  मोकळेपणाने हसत म्हणाले. 

शुभं भवतु ! 

आपला 
नानासाहेब

No comments: