Tuesday 28 August 2012

होता गर्भधारणा अशुभ वेळी संतती होई वेडी खुळी !

|| श्री ||

नमस्कार मित्रहो !

संतती सौख्य हा प्रत्येक  कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संतती होण न  होण पूर्व संचिताचा विषय आहे. संतती नसण  हे तर दुख: आहेच पण असूनही डोंगरा एव्हढे दुख: भोगण्याची   वेळ  आली  तर....

विभिन्न  समाजातील  लोक मतीमंद, वेडी , खुळी  संततीच दु:ख भोगत आहे. अनेक लोक या दु:खातून गेलेत, अनेक जात आहे., अनेक पुढेही जातील. पूर्वीच्या काळी वैद्यकीय सेवेअभावी असले प्रकार  घडत  असावेत असे मानले तरी आजच्या काळात जर अशा प्रकारची संतती जन्माला  येत असेल तर त्याला काय  म्हणाव

बर आजही काही लोक अशिक्षित, असंस्कृत  आहेत त्यांच्या वाट्याला असला   प्रकार आला तर आपण म्हणू  शकतो कि अज्ञानामुळे  त्याचं  काही  चुकल   असेल. पण आईवडील चांगले सुसंस्कृत, बुद्धिमान, असूनही जर त्यांच्या  पोटी एखादे मतीमंद, खुळे , वेडे, मुल जन्माला येत असेल तर ? 
  
या प्रश्नावर येवून मती कुंठीत होते, काही लोक याला अपवाद म्हणतील, अपवादात्मक गोष्टी घडतच असतात. पण या पाठीमागे  खरच काही कारण  असतील तर अपवाद म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

अशा प्रकारे  मुल जन्माला  आले तर आयुष्यभर दु:ख भोगाव लागत . त्या मुलाची सेवा करावी लागते. आयुष्य जगण्यातील आनंद हिरावला जातो . 

भारतीय ऋषीमुनींनी या बाबतीत सखोल चिंतन करून त्याबद्दल काही नियम केलेले आहेत. या नियमांचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा किंबहुना केलाच पाहिजे. 

अशी मुले कश्यामुळे जन्माला येतात याच रहस्य त्या मुलाच्या  कुंडलीतील  ग्रहयोगाच्या  माध्यमातून दिसून येते. मतीमंद आणि खुळी संतती  होण्याच  कुठलही  स्पष्ट कारण माता पित्यांच्या कुंडलीत दिसत नाही. 

पूर्वीच्या काळी राजघराण्यात , विद्वान कुटुंबात मनोवांच्छित संतती करिता विधीपूर्वक कर्म केले जात असे. त्याचे रिझल्ट्स सुद्धा तसेच चांगले मिळायचे.  

लोकांनी आजकाल ब-याच  चांगल्या गोष्टी ज्या षी मुनींनी सांगितल्या होत्या त्याही कर्मकांड म्हणून बाजूला सारल्या आहेत किंवा दूर केल्या आहेत.
 

अष्टमी ,  ग्रहण काळ, अमावस्या, पोर्णिमा, या तिथी गर्भधारणेच्या दृष्टीने   अयोग्य, अशुभ असतात.

1 तुकालाच्या  तीन  रात्री
२ अमावस्या
३ पौर्णिमा
4 एकादशी
५ प्रदोष काल
६ ग्रहण काल
७ कुटुंबातील
श्राद्ध विधी
पर्वाच्या दिवसात

उगाच विषाची परीक्षा न पाहता वरील  सांगितलेला कालावधी टाळा व  शिस्त पाळा नाहीतर आयुष्यभर न संपणार दु:ख  वाट्याला येऊ शकते .

 शुभं भवतु

आपला
नानासाहेब

No comments: