Wednesday 28 March 2012

विवाह बाह्य संबंध आणि मनस्ताप

ऑन लाईन कंसलटन्सी संपवून मी पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली हातातच घेतली होती इतक्यात  एक तरुण माणूस माझ्या कार्यालयात आला. मी त्याला बसायला सांगितलं. चेह-यावरून तो बराच त्रस्त दिसत होता. त्याच्या शारीरिक हालचालीवरून तो या क्षणी प्रचंड तणावात आहे हे लक्षात आल. अश्या वेळेस माणूस थोडक्यात आपली समस्या सांगूच शकत नाही हे गेल्या कितेक जातकांच्या अनुभवांती मला माहित झालेलं आहे. म्हणून मी त्याला आधी शांत करण्या करिता पाणी दिल. त्याच नाव, गाव विचारल, कोणी रेफरंस दिला वगैरे सारखे प्रश्न विचारले. हेतू हा होता कि आहे त्या मनस्थीतून थोडावेळ का होईना त्याला बाहेर काढण  आणि हेतू सफलही झाला बर का.   

मी त्याला विचारल "बोला काय अडचण आहे ?".

"आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात चालू आहेत, गेल्या चार दिवसांपासून मी झोपलेलो नाही ?"

"का ? अस  काय भयंकर घडल कि असे नको ते विचार डोक्यात यायला लागलेत ?" मी अगदी फ्रीज

"सांगायला लाज वाटते. पण सांगितलं पाहिजे. तुम्ही मला यातून बाहेर काढा."  तो दडपणाखाली बोलला.

"काय असेल ते सांगा. संकोच करू नका " 

त्यान बोलायला सुरवात केली. त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून जे काही कळल ते अस.....

त्याच लग्न झालेल आहे. त्याला दोन  मुल आहेत. बायकोही खूप चांगली सोज्वळ आहे. सर्व काही उत्तम चाललेलं असताना अचानक सहा सात महिन्या पूर्वी तो आणखी एका बाईच्या प्रेमात पडला. त्या बाई बरोबर जे काही संबंध होते ते चांगले चाललेले होते. अचानक  पाच सहा दिवसापूर्वी त्याचं टोकाच भांडण झाल. संबंध संपुष्टात आले आणि त्याची झोप उडाली. 

हे सगळ ऐकून मी म्हंटल " चांगल झाल. अश्या संबंधातून वाईटच निष्पन्न होत. आणखी काही वाईट घडण्या  अगोदर प्रकरण मिटल. आता नेमका प्रॉब्लेम काय आहे ?"

तो म्हंटला "मी तिला विसर म्हणता विसरू शकत नाही. रात्रं  दिवस तीच डोळ्यासमोर दिसते" 

"मग ? " मला कळेना मी काय मदत करू शकतो ते. 

"हे किती दिवस चालायचं ? मी यातन कधी बाहेर पडणार ? हे प्रकरण इथेच थांबेल कि परत पुढे चालू राहील ?"

अच्छा ! अस आहे होय. मला त्याची तीव्र इच्छा काय आहे ते कळल. पुनर्मिलन !

मी त्याची पत्रिका संघनकावर छापली व निरीक्षणाला सुरुवात केली.  
     
पत्रिका अभ्यासून झाल्यावर मी त्याला विचारल "या आधी पत्रिका कोणाला दाखवली  होती का ?"

तो म्हंटला "हो ब-याच जणांना दाखवली होती"

"त्यांनी काय सांगितलं होत " 

"तेच तर समजत नाही, प्रत्येकाने सांगितलं होत कि तुमच भविष्य उज्वल आहे. खूप जबरदस्त ग्रहबल का काय म्हणता ते आहे, पण प्रत्येक्षात तस काहीच घडल नाही. लग्ना आधी माझ कुठेही अस काही प्रकरण नव्हत. आताच कस झाल ते कळत नाही. काम धंदा सुद्धा धड चालत नाही. त्यामुळे जाम वैतागलोय मी"

मित्रहो  हि धनु लग्नाची कुंडली आहे. जे लोक लग्न कुंडली पाहून ज्योतिष सांगतात त्या फलिताची कशी काशी होते ते या पत्रिकेवरून आपल्या लक्षात येईल. पत्रिका बाजूलाच दिलेली आहे. नियमित वाचकांना सांगायची जरुरी नाही कि त्यावर टिचकी मारून मोठी करून पहा.

आधी लग्न कुंडली पहा. धनु लग्नाची पत्रिका आहे. लग्नेश  गुरु  लग्नात, त्याची सप्तमस्थानावर पूर्ण दृष्टी, सप्तमात शुक्र मिथुन राशीत. शुक्राची लग्नावर पूर्ण दृष्टी, चंद्र चतुर्थात तोही मीन या जल तत्वाच्या  राशीत,  मंगल भाग्यात,   रवी भाग्यात तेही स्वराशीत. अहाहा ! अशी पत्रिका म्हंटल्यावर माणूस कुटच्या कुठ जायला पाहिजे. नशीबवान आहेस पोरा !  अस त्यावेळी निव्वळ लग्न कुंडली मांडून ज्योतिष सांगणं-यांनी नक्कीच सांगितलं असणार. 

आता भाव चलित पत्रिका पहा. भाव चलित पत्रिका गणिताने तयार होते. गणित चुकल कि पत्रिका चुकते. असली गणित करायला ज्यांच्याकडे दरबार भरतो त्यांना वेळ मिळणार कधी ? असो . पूर्वी अस चालायचं. आता संघनकामुळे गणित करायची वेळ येत नाही. 

भाव चलित पत्रिकेत लग्नात राहू , धनु हि राशी द्विस्वभाव राशी आहे. त्यामुळे धनु लग्नाला सप्तम स्थान हे बाधकेश आणि मारकेश होत. सप्तमाचा स्वामी बुध अष्टमात. म्हणजेच सप्तमेश अष्टमात. गुरु व्ययात. काय होणार ? स्पष्ट आहे विवाह बाह्य संबंध किंवा अनैतिक संबंध  येणारच.

तसे आलेत, पण बुध अष्टमात  कर्क राशीत व सप्तमेश त्यामुळे वैवाहिक सौख्य अस्थिर,  मंगळ पंचमेशही  आहे. मंगळ पंचमेश असल्यामुळे प्रेम प्रकरणात मनस्ताप, चंद्र अष्टमेश त्यामुळे  मानसिक  संतुलन बिघडलेलं व कळस म्हणजे लग्नातील विषारी राहू डोक खराब करणार. चांगला विचारच सुचणार नाही, अविचारही  अविचार !  शिवाय लग्न धनु, धनु राशी म्हंटल म्हणजे असे  लोक नेहमी टोकाचीच भूमिका घेतात. एखाद्याच चांगल करायचं अस ठरलं तर लंगोटी सोडून देतील व वाईट करायचं ठरवलं तर जीव घेतील.

मी सर्व अभ्यास करून त्याला सांगितलं कि अजून चार वर्ष तुमचे संबंध टिकून राहतील. तोपर्यंत मंगळ पंचमेश आहे. नंतर शुक्राची महादशा लागेल व शुक्र सप्तमात मजबूत लागणार त्यामुळे वैवाहिक संबंध चांगले बळकट होतील. शुक्र गुरूच्या नक्षत्रात आहे व गुरु चतुर्थेश. एकदा का हि दशा लागली कि विषय संपला. 

यावर तो म्हंटला "आमचा संबंध आज न उद्या संपणार असेल तर आजच थांबायला काय हरकत आहे. मी आजच हे थांबवून टाकतो. अनायशा कारणही मिळाल आहे."

"वा वा क्या बात है ? जरूर जरूर ! असा पुरुषार्थ दाखवला पाहिजे " मी त्याला प्रोत्साहन देत म्हंटल खरी पण.. ? शक्य होत का हे त्याला ?

बोलता बोलता त्याला अचानक फोन आला आणि तो मग बोलतच राहिला. त्याचा तणाव ग्रस्त चेहरा नॉर्मलला येऊ लागला. हळू हळू तो विसरून गेला कि थोड्यावेळापूर्वी कसल्या भयंकर तणावातून गेलोय आपण. 

बोलतच तो उठला व खिशात हात घालून माझी फी दिली माझ्याकडे पाहून हातानेच परत येतो वगैरे सारख्या खुणा करून तो ऑफिस च्या बाहेर पडला. 

कोणाचा बर असेल तो कॉल ? येतोय का गेस करता? 

शुभं भवतु !

आपला 
नानासाहेब 

2 comments:

sharechimahiti said...

अष्टमेश चंद्र कुठे आहे ?... काही समजल नाही

nanasaheb said...

अष्टमेश चंद्र म्हणजे चंद्राची कर्क राशी अष्टमात आहे.